My Followers

Tuesday 31 July 2012

कार्यकर्ता बदनाम हुआ "अण्णाजी" तेरे लिये...!!!

कार्यकर्ता बदनाम हुआ "अण्णाजी" तेरे लिये...!!!  
   भ्रष्टाचारविरोधी प्रभावी जनलोकपाल विधेयकासाठी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे गेले चार दिवस चाललेल्या टीम अण्णाच्या उपोषणाला केंद्र सरकारने दाद न दिल्याने अखेर अण्णा हजारे स्वत: रविवारपासून मैदानात उतरले आहेत. रविवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासून अण्णांनी आपले बेमुदत उपोषण सुरू केले. जनलोकपाल विधेयक लवकर संमत करावे, केंद्र सरकारमधील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या १५ मंत्र्यांवर कारवाई करावी आदी मागण्यांसाठी टीम अण्णा २५ जुलैपासून जंतर-मंतर येथे आंदोलन करत आहे. त्याला सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने रविवारपासून अण्णांनी यापूर्वी इशारा दिल्याप्रमाणे उपोषण सुरू केले. प्राण गेला तरी बेहत्तर, पण आता माघार नाही, अशा शब्दांत अण्णांनी आपला निर्धार व्यक्त केला.  
    अण्णा हजारे आणि त्यांच्या टीमने पुकारलेल्या आंदोलनाला थंड प्रतिसाद मिळतोय. गेल्या वर्षी याच जंतरमंतरवर अण्णांनी लोकपालची लढाई सुरु केली होती. त्यांच्या यावेळच्या आंदोलनाला मात्र तुलनेने अत्यंत कमी प्रतिसाद मिळतोय. त्यातच बाबा रामदेव यांनीही आज य़ा आंदोलन ठिकाणी येण्याचं टाळलंय.
    सशक्त लोकपाल आणि केंद्र सरकारमधील 15 भ्रष्ट मंत्र्यांच्याविरोधात कारवाईच्या मागणीसाठी टीम अण्णाने मोठा गाजावाजा करत दिल्लीच्या जंतरमंतरवर उपोषणं सुरु केलं खरं. बुधवारी आंदोलनस्थळी ब-यापैकी गर्दी होती. मात्र गुरुवारी दिल्लीकरांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. जंतरमंतरवर आंदोलनाला कमी प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय. जी काही गर्दी आहेत, त्यात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या संस्थेचे कार्यकर्तेच मोठ्या संख्येनं होतं..

    गल्लीपासून दिल्ली पर्यंत गोर्‍या गोमट्या, साजूक तुपात वरण भात खाणार्‍या, फाडफाड इंग्रजी बोलणार्‍या, कॉर्पोरेट जगतात सहजपण वावरणारे, आऊटसोर्सड जॉब्स मध्ये  गलेलठ्ठ पगार कमावणारे, द्विपदवीधर, अंगाखाद्यांने निरोगी, डोळ्यांनी सतेज, वाणीने चलाख, बुद्धीने तल्लख असलेले मेणबत्ती वाहक ऊर्फ मेणबत्ती संप्रदायातले तरुण अण्णांच्या समर्थनार्थ दंड थोपडून उभे राहीलेत. आयपीएल च्या चीअरगर्ल्स प्रमाणे चिअरमेल्स किंवा चिअरबॉय बनून सगळ्यांना चिअर करत आहेत. 
पण या आंदोलनात काळ्या- बेंद्र्या चेहर्‍याचे, हाडाचा कडीपत्ता झालेले माथाडी कामगार, सडपातळ झालेले कृमीसदृश शेतकरी वर्ग, शहरात म्यूनिसीपल कॉर्पोरेशनसाठी कचरा उचलणारे, घरकाम करणार्‍या आमच्या आया-भगिनी, सफाई कामगार, फेरिवाले, नाक्यानाक्यावर गाड्या लावणारे, क्लास ३ आणि क्लाय ४ ची कामे करणारे, सारे शिक्षक, प्राध्यापक, गांडूबगीचा आणि गोलपिठ्यातल्या भगिनी, स्वस्त अत्तराच्या दर्पात काम करणारे तरूण, भाज्या घ्यायला परवडत नाही म्हणून दिवसआड मनात नसतानाही गुडसे ठोकणारे, गावकुसाबाहेरचे हेतूपुरस्सर दूर्लक्षित राहीलेले चेहरे ज्यांना मी खरा भारत समजतो ते ह्यात कुठेच दिसले नाहीत आणि दिसतही नाही आहेत. मग ह्या आंदोलनाला मी किंवा तुम्ही कोणत्या अर्थाने राष्ट्रीय आंदोलन म्हणावे ?
     गेले चार दिवस दिल्लीतील जनतेकडूनही टीम अण्णाला थंडा प्रतिसाद मिळत होता. रविवारी अण्णांनी उपोषण सुरू केल्यानंतर मात्र त्यात फरक पडून ब-या प्रमाणात गर्दी गोळा झाली. बाबा रामदेव आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी रविवारी एका व्यासपीठावर आल्याबद्दल टीम अण्णाने आपली नाराजी स्पष्ट शब्दांत नोंदवली होती. सोमवारी मात्र टीम अण्णाने घुमजाव केले. कोणालाही भेटण्यास रामदेव मुक्त आहेत. त्यांच्या मोदीभेटीविषयी आमची तक्रार नाही. लोकपाल विधेयकासाठी आम्हीही सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी घेतल्याच होत्या ', अशी सारवासारव कुमार विश्वास यांनी केली. दरम्यान केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या घरासमोर काही अण्णासमर्थकांनी निदर्शने केली. 
             प्रसारमाध्यमांतून अण्णांच्या आंदोलनास लोकांची गर्दी जमत नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर टीम अण्णांचेअनेक कार्यकर्ते दुखावले गेले अण्णांच्या आंदोलनास मीडिया चूकीच्या पद्धतीने देशास दाखवते आहे, असे आरोपकरत काही कार्यकर्त्यांनी मीडियाविरोधात घोषणा देत मीडिया कर्मचा यांना सोमवारी धक्काबुक्की केली होती .तसेच एका पोस्टरवर काही कुत्र्यांच्या गळ्यात मीडियाच्या पाट्या दाखवण्यात आल्या आणि त्याची दोरी सोनियागांधी यांच्या हातात असल्याचे दाखवले होते या सर्व प्रकारावर मीडियाकडून नाराजी व्यक्त कऱण्यात आली होतीतसेच ब्रॉडकास्ट एडिटर्स असोसिएशनकडून टीम अण्णांना एक पत्रही पाठवण्यात आले होते टीम अण्णांच्यासदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या या कृत्यावर आम्ही नाराज आहोत आणि या सर्व प्रकराबद्दल त्यांनी जाहीरमाफी मागावी असे या पत्रात म्हटले होते त्यानुसार आज ११च्या सुमारास अण्णा आणि अरविंद केजरीवालयांनी मीडिया कर्मचा यांची जाहीर माफ मागितली या प्रसंगी बोलताना, आंदोलनात मीडियाची अथवा अन्य कोणाचाही बदनामी पुन्हा केल्यास आंदोलन मागे घेण्यात येईल असा स्पष्ट इशाराही अण्णांनी यावेळी दिला 
            प्रसारमाध्यमं हा लोकशाहीचा चौथा आणि अतिशयमहत्वाचा स्तंभ आहे त्यांच्या विरोधात जर कुणी कृत्य केलेकिंवा आंदोलनाला हिंसक बनवण्याचा कुणी प्रयत्न केला तर हेआंदोलन मागे घेतले जाईल अशा इशारा ज्येष्ठ समाजसेवकअण्णा हजारे यांनी आज दिल्लीतील जंतरमंतर येथून दिला .टीम अण्णांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरमधून मीडियाला कुत्राअसे संबोधले होते त्यानंतर अण्णांनी हा माफीनामा सादरकेला     
          प्रसार माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते. परंतु मागच्या वर्षी या चौथ्या स्तंभाला "अण्णाजी" नामक कावीळ झाला होता. तो आता बरा झालेला दिसतोय त्यामुळे "जंतरमंतर वरची गर्दी छु मंतर"  हि खरी परिस्थिती दाखवत आहेत. परंतु हे अण्णा समर्थकांना अमान्य झाल्यामुळे त्यांनी प्रसारमाध्यमांच्या   प्रतिनिधीवर हल्लाबोल केला. तसेच टीम अण्णा चे सदस्य प्रशांत भूषण यानी देखील  प्रसारमाध्यमांवर कडाडून टीका केली.   "टीमअण्णा"  नावाचा ज्वर उतरला असला  तरीही काही प्रमाणात  सामान्य  कार्यकर्ते अहिंसेच्या नावाखाली हिंसात्मक आंदोलन करून बदनाम होत आहेत... या सामान्य जनतेच्या भविष्याशी हा खेळ खेळणे टीम  अण्णा कधी बंद करेल ?

जनलोकपाल आंदोलनामागील 'मेंटल मॉडेल्स'...!!!
                            
         प्रस्थापित राज्यव्यवस्था भ्रष्टाचाराचे संकट टाळण्यास असमर्थ आहे, असे दिसून आल्याने अण्णा हजारे यांच्यावर अवतार-संकल्पनेचा प्रभाव पडला. मेंटल मॉडेल्सचा प्रभाव असलेल्या जनतेला तो भावनात्मकदृष्ट्या पटला. त्यातून शोध सुरू झाला आणि जनलोकपालाचा जन्म झाला. 
       सिव्हिल सोसायटी म्हणविणारी टीम अण्णा म्हणजे सर्व भारतीय जनता नव्हे; अण्णांची मागणी घटनाविरोधी आहे; येणारा लोकपाल भ्रष्ट निघाला तर त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवणार?,' अशा मुद्यांचा अण्णा हजारेंना पाठिंबा देणाऱ्यांवर परिणाम झाला नाही. पाठिंबा देणाऱ्या अनेक तरुणांना व महाराष्ट्रातील कार्यर्कत्यांना मी भेटलो; पण जनलोकपाल कशा प्रकारे भ्रष्टाचार नष्ट करणार याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. येणारा जनलोकपाल हा आणखी एक स्वाथीर् बाबू नाही तर विकासविरोधी भस्मासूर म्हणून जन्मास येणार आहे, अशी भूमिका घेऊन मी जनलोकपालाला जाहीर विरोध केला होता. 
         खरी भारतीय मूल्ये खेड्यात संवधिर्त होतात व पाळली जातात, तसेच भावनाही बळावल्या जातात असे म्हणतात. अण्णा व त्यांना पाठिंबा देणाऱ्या लोकांवर जनलोकपालाची पडलेली भुरळ भावनेवर आधारित आहे, ज्ञानावर नव्हे. जनलोकपालाची कल्पना अण्णांना आवडण्या-मागे त्यांची खेडेगावात झालेली जडणघडण कारणीभूत आहे. जनलोकपाल हे मूळ भारतीय मॉडेल नव्हे. 'ऑम्बुड्समन' म्हणजे जनतेच्या तक्रारी ऐकणारा शासकीय अधिकारी, हे पद इतर देशांत आहे. अण्णांनी हे मॉडेल भारतासाठी का निवडले, हे समजून घेण्यासाठी अण्णा व त्यांच्या टीमवर कर्मकांडातून होत असलेले संस्कार समजून घेतले पाहिजेत. अण्णा आणि माझे खेडे यात ७० कि.मी. व आमच्या वयात १२ वर्षांपेक्षा कमी अंतर आहे. दोन्ही खेड्यांतील सांस्कृतिक, धामिर्क, राजकीय परिस्थितीत फार फरक नाही. खेड्यात घातल्या जाणाऱ्या सत्यनारायण पूजेनंतरचा चिमूटभर प्रसाद आणि चमचाभर तीर्थ यांचे आम्हाला बालपणी आकर्षण असे. पुढे आकर्षण वाढले ते सत्यनारायणाच्या कथेचे. साधू नावाच्या एका वाण्याने मूल व्हावे म्हणून सत्यनारायण व्रत घालण्याचा नवस केला. कलावती नावाची मुलगी झाली. पुढे कलावतीचा नवरा व्यापारासाठी परदेशी गेला असता चोर म्हणून पकडला गेला व मोहरांनी भरलेले त्याचे जहाज बुडाले; कारण साधू वाण्याने व्रत पूर्ण केले नव्हते. कलावतीने सत्यनारायण पूजा घातल्याने जहाज व नवरा परत मिळाले. सत्यनारायणाच्या कथेने आमचे बालपण, किशोरावस्था आणि तरुणपण प्रभावीत करून टाकले होते. 

          जेव्हा सृष्टीत उपदव सुरू होतात, विनाशाची प्रक्रिया वाढू लागते व मानव समाजाच्या धर्माची घडी विस्कटते तेव्हा तो विनाश थांबविणे, ती घडी पुन्हा नीट बसविणे, मानवसमाजाला धर्ममार्गा-वर आणणे, यासाठी भगवंत युगानुयुगे अवतार घेतो, अशी भारतीय श्रद्धावंतांची पक्की धारणा आहे. अवतारकल्पना पुराणांनी वाढवली; अनेक कथांच्या रूपाने तिचा विकास झाला. त्यामुळेच यदा-यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत! हा श्लोक तनामनाने आम्ही स्वीकृत केला आहे. आमच्या घरात कुणी आजारी पडले की वडील रामभटजीकडे जात. जनावर आजारी पडले, हरवले, शुभकार्याचा मुहूर्त, ग्रहण का लागते या सगळ्या समस्यांवर पंचांगावरून रामभटजी तोडगा सांगत. बहुजनांच्या सगळ्या संकटांवर त्या वितभर ग्रंथात उत्तर असे. सत्यनारायण पूजा, अभिषेक अशा कर्मकांडांतून तात्काळ सुख, समृद्धी, न्याय मिळविण्याच्या चमत्कार-पूर्ण गोष्टी अण्णा व माझ्या पिढीच्या मनावर कोरल्या गेल्या. पुराणांच्या संस्कारातून जग समजून घेण्याची व कार्य करण्याची आमची मेंटल मॉडेल्स बनली. याच मेंटल मॉडेल्सच्या आधारावर अण्णा व त्यांच्या टीमने भारतातील भ्रष्टाचारासारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नाला अवतारकल्पना आणि चमत्कार करून संकटमुक्त करणाऱ्या प्रतिकाची हुबेहूब प्रतिमा असलेल्या जनलोकपालाची निवड केली. 
        पुराणकथांतील अवतार, सत्यनारायण पूजेतील चमत्कार ही सर्व मेंटल मॉडेल्स असून मनावर खोलवर बिंबलेली असतात. त्यांना आधार नसला तरी ती सत्य आहेत, असे मानले जाते. मेंटल मॉडेल्स म्हणजे व्यापक अर्थाने मानलेला सिद्धांत, प्रतिमा अगर चित्र असते. जग कसे आहे हे समजून घेताना अगर कृती करताना त्याचा आपणांवर अजाणतेपणे प्रभाव पडतो. अण्णांनी वयाच्या २६व्या वषीर् देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. देशापुढील प्रश्न समजून घेताना, प्रत्यक्ष कृती करताना अण्णांवर संस्कारातून निर्माण झालेल्या मेंटल मॉडेल्सचा प्रभाव पडलेला आहे. ही मेंटल मॉडेल्स अण्णांप्रमाणेच समाजातील मोठ्या समूहाने मूकपणे स्वीकारलेली आहेत. 
         अण्णाच नव्हे तर कोणतीही एक व्यक्ती संपूर्ण देश अगर समाजातील प्रश्न आणि त्यांची उत्तरे डोक्यात साठवू शकणार नाही. कथा, प्रतिमा, आधाराविना खरी मानलेली गोष्ट, ठोकताळे अशा बाबी डोक्यात साठवल्या जातात. आपल्यावर झालेल्या संस्काराचा जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर मोठा परिणाम होतो. मेंटल मॉडेल्सचा महत्त्वाचा दोष म्हणजे प्रत्येक समस्येसाठी सोपे उत्तर दिलेले असते. प्रस्थापित राज्यव्यवस्था भ्रष्टाचाराचे संकट टाळण्यास असमर्थ आहे, असे दिसून आल्याने अण्णांवर अवतार-संकल्पनेचा प्रभाव पडला. मेंटल मॉडेल्सचा प्रभाव असलेल्या जनतेला तो भावनात्मकदृष्ट्या पटला. त्यातून शोध सुरू झाला व जनलोकपालाचा जन्म झाला... 
         गेल्या चार हजार वर्षांपेक्षा जास्त काळा-पासून समाजातील एका मोठ्या वर्गाने वाचू नये व विचार करू नये असे बंधन घालण्यात आले होते. लहानपणी आम्ही आईवडिलांचा विचार अंतिम मानत असू, शाळेत शिक्षकांचा, ऑफिस-मध्ये साहेबांचा व समूहाने वागताना मेंटल मॉडेल्सचा. ४० वर्षांपूवीर् सातवीत वा अकरावीत जास्त मार्क्स मिळविले पाहिजेत असा आमच्या पालक-शिक्षकांचा अट्टहास असे. सगळी शिक्षण व्यवस्था कालबाह्य होती व मुलांना वाढविण्याची पद्धत परिपूर्ण नव्हती. आजची पिढीही घोकम-पट्टी करून मार्कांच्या मागे लागली आहे. आमच्याकाळी असलेल्या रुढी, परंपरा, कर्म-कांडे, सवयी, विचार, साहित्य आजही तसेच आहे. शाळेत शिकविले जाणारे साहित्य रंजन-वादी असून आहे तीच व्यवस्था कायम राखणारे कारकून बनविण्याचे काम करते. इंग्रज आल्यानंतर आम्ही वाचन सुरू केले, पण विचार करण्यासाठी अजून आम्ही आमची पूर्ण क्षमता वापरत नाही की काय, अशी शंका अण्णांच्या मुंबईतील उपोषणाच्या कार्यक्रमाअगोदर वाटत होती. आता मात्र आम्ही आमच्या मेंटल मॉडेल्समधून बाहेर पडल्याचे चित्र दिसू लागले आहे. कालबाह्य व्यवस्थेशी दोन हात करण्याची तयारी आता करता येईल... 

    भारतात आजमितीला मोजल्याप्रमाणे एकुण किंवा जवळपास ६,३८,३६५ गावे आहेत. आणि त्याचबरोबरीने जवळपास ३३ लाख एन जी ओ आहेत. म्हणजे दर ४०० भारतीय नागरिकांमागे एक एनजीओ कार्यान्वित आहे. आणि जर हीच आकडेवारी पोलिसांच्या बाबतीत पाहीली तर दर १५०० माणसांमागे एक पोलिस कर्मचारी आहे. पण जर ह्या एन जी ओ खरचं विकासासाठी झटतायेत आणि त्या सत्य निष्ठेने काम करतायेत तर भारतात कुपोषण,अनारोग्य,   सावकारग्रस्तनिरक्षरता का संपली नाही. मग अनुदानाचे नेमके काय केले जाते. त्याचा कोणता हिशोब दाखवला जातो काहे सगळे असताना ह्या एन जी ओ नावाच्याEXTRA CONSTITUTIONAL AUTHORITY वर विश्वास का ठेवावा?  जनलोकपाल बिलाच्या नावाखाली तथाकथित आणि स्वघोषित समाजसेवकांनी जे काही नाटक उभारलेय ते दुसरे तिसरे काही नसून जुनी  जातीयवादाची  SLAVERY SYSTEM   प्रस्थापित करण्याचा घाट आहे. ज्याची अनौरस फळे या देशातल्या अभिजनेतर वर्गाला आजपर्यंत सोसावी लागत आहेत. ह्याच वंचितांकडे कोणतीही एनजीओ नाही. त्यांना कटाक्षाने सिविल सोसायटीपासून दूर ठेवण्यात आले आहे.
अँड. राज जाधव...!!!
(संदर्भ -  सम्यक समीक्षा ब्लॉग, महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्र मधील लेख,  विविध प्रसार माध्यमे,  सुरेश खोपडे आय.पी.एस. निवृत्त) यांचा लेख.)

6 comments:

  1. JaiHind, Jai Bhim,
    Tumhala hay andolana badal kaahi mahit nahi, tyamule kahihi chukiche lihu naka. ani kiti Rupaye ghetalet tumhi apalay deshala vikayala.
    Dr Ambedkarana hi laj vatel tumcha sarakhay corrupt lokan badhal.....Dr Ambedkaracha desha madhe tumcha sarakhe gadar ahet kech vait vatate...
    Jai Hind, Jai Bhim

    ReplyDelete
  2. मयूर गायकवाड साहेब चांगलेच जोक करता कि तुम्ही.... म्हणे किती पैशे घेतले तुम्ही ? अहो काय लहान मुलांसारख्या कमेंट करताय ? मी जी सत्य परिस्थिती आहे तीच लिहलीय... आणि थोडाच कालावधी मध्ये तुम्हाला कोणी हि काही न सांगता कळेल कि "अन्ना पार्टी" कोणत्या दिशेने जात आहे... तेव्हा तुम्हीच म्हणाल.."मै अन्ना था...!!!"

    ReplyDelete
  3. आपण केलेले लिखाण संपूर्ण भारतातील जनता खरेच मन लावून वाचलं तर समजल हा गरिबी विरुद्ध डाव आहे ...अभिनंदन आपली लेखणी अशीच पाजळू धा....

    ReplyDelete
  4. दीपरत्न साहेब तुमच्या प्रोह्त्सानाबद्दल खूप खूप आभार...!!!

    ReplyDelete
  5. या वेळी "टीम अण्णा"चे सगळेच आडाखे चुकलेले दिसतात.

    "टीम अण्णा"पैकी चौघांनी अण्णांच्या चार दिवस आधीपासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला ही पहिली मोठी चूक. कारण अण्णा उपोषणाला बसेपर्यंत या बिचार्‍या अनुयायांच्या उपोषणाला जनमानसाने कांहींही किंमतच दिली नाहीं. त्यामुळे त्यांचे चार दिवसांचे उपोषण वायाच गेले. अण्णा उपोषणाला बसल्यानंतर जनता पुन्हा त्यांच्या आंदोलनात भाग घेऊ लागली होती. ३ ऑगस्ट रोजी त्यांची तब्येतही ठणठाणीत होती. त्यांचे उपोषण पाचव्या दिवसात प्रवेश करते होईपर्यंत त्या आधी चार दिवस उपोषण सुरू केलेल्यांची तब्येत ढासळू लागली होती. त्यामुळे या आंदोलनाचा दबाव सरकारवर पडण्याऐवजी तो दबाव तब्येत ढासळू लागलेल्या "टीम अण्णा"च्या चार कार्यकर्त्यांवर पडला व त्यांची पंचाईत झाली. अरविंद केजरीवाल हे एक अतीशय मनस्वी आणि प्रामाणिक कार्यकर्ते आहेत असे मला मनापासून वाटते. ते डावपेच आखण्यात आणि वातावरणनिर्मितीतही कल्पक आणि कुशल आहेत. पण अद्याप त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि नेतृत्वात अण्णांच्या व्यक्तिमत्वाची आणि नेतृत्वाची उंची नाहीं, अण्णांना मिळालेली महनीयता अद्याप त्यांना प्राप्त झालेली नाहीं. आज जे महनीयतेचे तेजस्वी वलय फक्त अण्णांच्या डोक्यामागे आहे ते या कार्यकर्त्यांच्या डोक्यामागे नाहीं! सध्या त्यांची तपश्चर्याही तेवढी नाहीं. त्यामुळे त्यांच्या प्राणांना अण्णांच्या प्राणाइतकी किंमत सरकारने (व जनतेनेही) दिली नाहीं. त्यामुळे आजच्या घडीला तरी एक स्वतंत्र आंदोलक म्हणून नव्हे तर केवळ अण्णांचे सहाय्यक म्हणूनच त्यांना जनता ओळखते आणि म्हणूनच चार दिवस आधीपासून उपोषण सुरू करण्याचा त्यांचा डावपेच पार चुकीचा ठरला व हे आंदोलन सुरू होता-होताच पराभवाच्या भोवर्‍यात सापडून गटांगळ्या खाऊ लागले. या चुकीच्या डावपेचांमुळे हे आंदोलन विजयी होण्याची आशा ते सुरू होण्याआधीच मावळली होती.

    दुसरी चूक झाली उपोषण सोडण्याच्या कारणांची! कोण कुठली २३ ’आदरणीय’ माणसे एक आवाहन करतात काय आणि "टीम अण्णा" आपले उपोषण थांबवते काय! काय किंमत आहे या २३ जणांना अशा आंदोलनाबाबत निर्णय घेण्याची? अणांना उपोषण सोडायची गळ घालण्याऐवजी या सर्व आदरणीय व्यक्तींनी अण्णांच्या मांडीला मांडी लावून उपोषणाला बसायला हवे होते. ते राहिले बाजूला. ही मंडळी अण्णांना आवाहन काय करतात आणि कालपर्यंत "ही आत्महत्या नसून ते आमचे भारतमातेच्या चरणी केलेले बलिदान आहे, आमच्या तोंडात अन्न कोंबले तर आम्ही ते थुंकून देऊ व घशाखाली उतरू देणार नाहीं" अशा घोषणा करणारी "टीम अण्णा" उपोषण आवरते काय घेते, सारेच विपरीत व अनाकलनीय. कसेही करून उपोषणाच्या धोक्यातून बाहेर पडण्यासाठी शोधलेली ती जणू एक तरकीबच होती असे कुणाला वाटले तर त्यात काय आश्चर्य?

    आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली. ऑगस्ट २०११च्या उपोषणाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रसिद्धीमुळे, त्याला जनमानसातून मिळालेल्या बुलंद समर्थनामुळे, पाठिंब्यामुळे आणि शेवटी त्या उपोषणाच्या यशस्वी सांगतेमुळे सार्‍या "टीम अण्णा"ला एक उन्मादच चढला असावा व ’ग’ची बाधाही झाली असावी. त्या उन्मादाच्या भरात "टीम अण्णा"ने अनेक चुका करून स्वत:च आपले अवमूल्यन करून घेतले. "टीम अण्णा"ची अनेक निवेदने खूपदा दर्पोक्ती वाटावी इतकी उद्धट होती. पाठोपाठ "टीम अण्णा"त फाटाफूटही होऊ लागली. कारण उच्चपदस्थ व आदरणीय माणसे जमा करणे सोपे असले तरी त्यांच्यात एकमत घडवून आणणे व एकी कायम ठेवणे महा कर्मकठीण. प्रत्येकाला आपल्यालाच काय ते समजते, बाकीच्यांनी त्यांच्या आदेशाचे निमूटपणे पालन करावे असेच अशा लोकांपैकी बर्‍याच जणाना वाटते. आपापल्या क्षेत्रात त्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशामुळे त्यांच्याभोवती ’होयबां’चा गराडाही असतो. त्यामुळे अशा अनेक व्यक्ती एकत्र आल्यावर त्यांच्यात एकमत होणे अशक्यच. अण्णांसारखा दृढनिश्चयी नेताच त्यांना एकत्र ठेवू शकतो. पण इथे असे झाले नाहीं असेच दिसते.

    त्यात किरण बेदीने वरच्या वर्गाच्या तिकिटाचे पैसे घेऊन खालच्या वर्गाने प्रवास करून पैसे वाचविल्याच्या बातम्याही बाहेर आल्या. भले ते पैसे त्यांनी सत्कार्यासाठी वापरले असतीलही. पण या घटनेमुळे त्यांचे चारित्र्यहनन तर नक्कीच झाले. अशा कांहीं घटनांमुळे वैतागून असेल, पण अण्णांनी अचानकपणे दोन-एक आठवडे "मौनव्रत" आरंभले. हेतू कितीही उदात्त असला तरी त्याचा परिणाम अण्णांच्या डोक्याभोवतीच्या उदात्ततेच्या वलयाचे तेज कमी होण्यातच झाला. परिणामत: मुंबईला आरंभलेल्या त्यांच्या उपोषणाला जनमानसातून अगदीच किरकोळ प्रतिसाद मिळाला.

    ReplyDelete