My Followers

Wednesday 27 June 2012

Kaun Banega Rastrapati?


Kaun Banega Rastrapati?


Welcome to the latest Reality Show in India. The race is on for the top job and there are any number of contestants fighting tooth and nail to win the jackpot.And what a jackpot it is!No exaggeration, but becoming the President of India may well be the most coveted position in the world. What perks! What a residence! And zero responsibility. No wonder so many hopefuls are frantically scrambling for the honour. Clearly, they are greatly inspired by Shrimati Pratibha Patil’s tenure. And longing to step into her chappals. Here is a lady who was propelled into the Rashtrapati Bhavan as our 12TH President, almost by default. Startled but entirely delighted when her name was thrown into the ring less than twelve hours before the announcement , Pratibha swiftly grew into the ceremonial role and didn’t look back even once, except to check if her entire family was right there behind her, as she merrily traipsed the globe. It’s silly to ask what exactly she did during her tenure. She wasn’t expected to do anything, for God’s sake! And she was good enough to oblige. Which is pretty much why she’d been hand picked for the job. These are delicate decisions that require forward thinking. Those who orchestrate such mighty matters, are good with math. It’s all about getting the numbers right. Who knows what may happen during a national emergency? Which person could pull the rug from under the feet of which party? What then? Aha – that’s when a compliant President comes into the picture. It helps to have someone co-operative sitting pretty as the Head of the State, the Commander –in- Chief of the Armed Forces.All it needs is some nifty juggling - addition, subtraction, multiplication and division. Basic stuff. An accommodating Prezzie doesn’t get into details. It’s left to experts. A number here, a number there – big deal. Everything can be managed. Yes , baba. Even in a democracy!
·    The current Presidential race is slightly different. There is open lobbying for the job. Nobody is shocked. We live in different times, and soliciting is no longer considered bad form. It’s fine to go out there and hustle to become the President of India.Nobody blinks. Nobody goes ‘tch tch’. That’s how it’s done aaj kal. Look at the blatant way in which our top stars aggressively pitch for plum roles in Bollywood blockbusters.There’s no shame attached. After all, dhanda is dhanda. Same thing here.The Presidential race has also been reduced to the bargaining power of candidates. And what’s the use saying stuff like, “Would Dev Anand or Yusuf Saab have gone around with a begging bowl asking to be cast in a coveted role?” We know the answer. Was there less competition back then? Not really. But the heroes had their pride and self respect to consider. A few hints here and there may have been dropped. But there it stayed. Ditto for our former Presidents ( well, not all, but most of them). Going by the fierce horse trading taking place on the national stage, we have diminished the nomination process to haggling in a noisy mandi . A tacky affair between interested parties and their sponsors. 
But,unlike other Reality Shows on television, this one doesn’t need a star anchor. Nor a panel of celebrity judges.Some canny producer should instantly cash in by jumping on the Presidential bandwagon and announcing a show of shows - the first of a kind, in which the aam aadmi can participate . Why not? It would be a win-win situation for all. And the gullible of the land would actually believe their votes have made the difference! The show could be cleverly formatted adopting various platforms. ‘SMS your choice to’’ kind of stuff. Twitter, Facebook.... the possibilities are limitless. And highly lucrative, too. Since the people of India would be directly involved in such an enterprise, it would have to be converted into a talent based show. I am sure Purno Agitok Sangma can sing, dance, play the guitar, pull strings and so on. Pranabda would need some coaching in this area, but he has other skills which could be tapped into - miming?? Someone else could blow his trumpet or undertake playback singing ( strictly Rabindra Sangeet, of course). If we get this right, we would have our Indian Idol in Rashtrapati Bhavan... without involving Asha Bhosle. And then the Rashtrapati Bhavan could host the biggest rock show in India – what a gig that would be! All Bharatwaasis, warmly invited.
(From Shobhaa De's Blog)

Tuesday 26 June 2012

बाबासाहेबांचे महानिर्वाण...!!!


बाबासाहेबांचे महानिर्वाण...!!!


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पार्थिव देह गुरुवार ता. ६-१२-५६ रोजी रात्री सव्वा तीन वाजता सांताक्रूझ विमानतळावर आणण्यात आला. हजारों लोकांनी तेथे त्यांच्या पार्थिव देहाला अभिवादन केले. दुपारी तीन वाजल्यापासून विमानतळावर लोकांची रीघ सुरू होती. तीनच्या सुमाराला सुमारे वीस हजार लोक विमानतळावर हजर होते. ही गर्दी सारखी वाढतच होती. मुंबईत त्यादिवशी दुपारपासूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूस जागोजाग लोकांचे थवे उभे होते. या सर्वांच्या चेहेऱ्यांवर दुःखाची दाट छाया पसरलेली होती. अस्पृश्य समाजांतील स्त्रिया तर टाहो फोडून रडत होत्या. ‘आता आम्हाला कोण विचारणार?’ या आर्त वाणीने त्या एकमेकांकडे असहायतेने पहात होत्या. बाबासाहेबांच्या देहावसानाची बातमी पसरतांच मुंबईच्या बहुतेक सर्व गिरण्यांहून स्वयंस्फूतीने कामगार बाहेर पडले व त्यांनी अंतःकरणाच्या तळमळीने दुखवटा व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रकृति गेले काही दिवस बरी नव्हती. ते मंगळवारी राज्यसभेच्या बैठकीस हजर होते. बुधवारी मध्यरात्री ते झोपावयास गेले तेव्हा त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे दिसले नाही. गुरुवारी सकाळी सहा वाजता त्यांचा नोकर चहा घेऊन गेला तेव्हा त्यांचे प्राण पंचत्वांत विलीन झाले होते. निधन समयी त्यांचे वग पासष्ट वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच पंतप्रधान नेहरु, दळणवळण मंत्री श्री जगजीवनराम, राज्यसभेचे उपसभापती श्री. कुष्णमूर्ति राव आदींनी अलीपूर रोडवरील त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रध्दांजली अर्पण केली. लोकसभा व राज्यसभा यांचे कामकाज त्यादिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृत्यर्थ तहकूब करण्यात आले.
विमानतळ ते ‘राजगृह’...!!!
त्या दिवशी पहाटे सांताक्रूझ विमानतळावरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शव दादर येथील हिंदू कॉलनीतील ‘राजगृह’ या त्यांच्या निवासस्थानी आणले जात असताना मुंबईतील व उपनगरांतील जनतेने त्यांना जी भावनापूर्ण श्रध्दांजली वाहिली तशी यापूर्वी अन्य नेत्यास क्वचित वाहिली असेल.
विमानातून डॉ. बाबासाहेबांचा पुष्पाच्छादित पार्थिव देह बाहेर काढताच विमानतळावरील डॉ. बाबासाहेबांच्या आप्तेष्ट स्त्रिया ओक्साबोक्शी रडू लागल्या. पुरुष मंडळींनासुध्दा आपले अश्रू आवरणे कठीण झाले. बाबासाहेबांचा पार्थिव देह घेऊन येणारे इंडियन एअर लाईन्स कार्पोरेशनचे खास विमान पहाटे दोन वाजता सांताक्रूझ विमानतळावर उतरले. त्यावेळी विमानतळावर पंचवीस हजार स्त्री-पुरुष उपस्थित होते. डॉ.बाबासाहेबांच्या अखेरच्या दर्शनाची संधि मिळावी म्हणून विमानतळाबाहेरील जागेत त्यांनी दोन रांगा केल्या होत्या. खुद्द विमानतळावर बाबासाहेबांचे आप्तष्ट व आचार्य मो. वा. दोंदे, बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंतराव, श्री. बी. सी, कांबळे, श्री. मधु दंडवते, श्री. आर. डी. भंडारे व शेडयूल्ड कास्ट फेडरेशनचे आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विमानांतून बाबासाहेबांचे शव बाहेर काढल्यावर त्याला पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सिध्दार्थ आर्टस व सायन्स कॉलेज, सिध्दार्थ लॉ कॉलेज, सिध्दार्थ कॉमर्स कॉलेज, शेडयुल्ड कास्ट्स फेडरेशन व भारतीय बौध्द महासभा यांच्यावतीने पुष्पहार घालण्यात आले. त्यानंतर नगरपालिकेच्या ऍम्ब्युलन्समध्ये शव ठेवण्यात आले व तेथून मूक मिरवणुकीस प्रारंभ झाला.
डोळयांत अश्रू, हातात फुले...!!!
सांताक्रूझ विमानतळ ते ‘राजगृह’ या पाच मैलांच्या रस्त्यावर ठिकठिकाणी दुतर्फा हजारो स्त्री-पुरुष नागरिक त्या दिवशी दुपारपासून आपल्या प्रिय नेत्याला आदरांजली वाहण्यासाठी रात्रीची आणि थंडीची पर्वा न करता उभे होते. डॉ. बाबासाहेबांना घेऊन येणाऱ्या ऍम्ब्युलन्सची वाट पहात अफाट जनसमुदाय कित्येक तास तिष्ठत होता. त्यांच्या डोळयांत अश्रु आणि हातात फुले किंवा हार होते. सारा समुदाय अत्यंत शिस्तबद्व होता. ऍम्ब्युलन्सच्या पुढे पोलिसांची मोंटार होती. परंतु त्या मोटारीतून शिस्त व शांतता राखण्याच्या सूचना दिल्या. जाण्यापूर्वीच शिस्त आणि शांतता राखली जात होती.
बाबासाहेबांचा चेहरा सर्वांना दिसावा म्हणून ऍम्ब्युलन्समध्ये खास प्रकाश योजनेची व्यवस्था करण्यात आली होती. सांताक्रुझ ते दादर हे पाच मैलांचे अंतर एरवी मोटारीने वीस मिनिटात तोडता येते.परंतू सर्वांना बाबासाहेबांचे अखेरचे दर्शन मिळावे व त्यांना पुष्पाजंलि वाहता यावी म्हणून ऍम्ब्युलन्सचा वेग अगदी कमी करण्यात आला होता. ऍम्ब्युलन्सने रात्री अडीच वाजता सांताक्रुझ सोडले. परंतु ती दादरला राजगृहात येईपर्यत पहाटेचे पांच वाजले होते. या एकाच गोष्टीवरुन सांताक्रुझ, कुर्ला, सायन, माटूंगा, दादर येथील नागरिक किती मोठया संख्येने उपस्थित होते त्याची कल्पना येईल.
राजगृहापाशी...!!!
बरोबर पाच वाजून पाच मिनिटानी ऍम्ब्युलन्स राजगृहाशी आली. तोपर्यत तेथे रात्रभर साडेतीन लाख लोक ऍम्ब्युलन्सची वाट पहात बसून होते. ‘बुध्दं सरणं गच्छामि’ ची प्रार्थनाही तेथे सतत चालू होती. ऍम्ब्युलन्स राजगृहापाशी येताच लोकांनी इतकी गर्दी केली की, पांच सात मिनिटे पोलिसांना व समता सैनिक दलाच्या सैनिकांनी ती आवरणे अशक्य झाले. तथापि नेत्यांच्या विनंतीस मान देऊन सर्वांनी पूर्ववत् शिस्त शांतता स्थापन केली. बरोबर सव्वा पाच वाजता मेणबत्त्यांच्या मंगल प्रकाशात व उदबत्त्यांच्या सुवासांत डॉ. बाबासाहेबांचे शव ऍम्ब्युलन्समधून उतरविण्यात आले. त्यावेळी तेथे असलेले लाखो लोक धाय मोकलून रडत होते. अर्ध्या तासानंतर डॉ.बाबासाहेबांच्या पार्थिव देहाचे अत्यंदर्शन घेण्याची जनतेस मुभा देण्यात आली. विमानतळावर उपस्थित असलेल्या हजारों लोकांपैकी अनेक लोक चालत आले होते. दुपारी तीन वाजल्यापासून ते विमान येईल म्हणुन ते वाट पहात होते. विमानतळावरील एक हमाल म्हणाला ”आज खरोखर माझी डयुटी नाही. परंतु बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन जवळून घेण्याची संधी मिळावी म्हणून मी डयुटीवरचा पोशाख घालून आलो आहे.’ विमानतळावरील दुसरा एक अधिकारी म्हणाला, ”अापल्या आवडत्या पुढाऱ्याचे दर्शन मिळावं म्हणून बारा बारा तास वाट पाहणारे अनुयायी ज्याला लाभतात त्याच्या लोकोत्तरपणाला तुलनाच नाही.”
‘राजगृहा’तील दर्शन...!!!
‘राजगृहा’च्या पश्चिमाभिमुखसज्जांत बाबासाहेबांचे शव ठेवण्यासाठी शामियाना उभारण्यांत आला होता. या शामियान्यांत पुष्पशय्येवर पार्थिव देह ठेवण्यात आला. त्यांच्या उशाकडील बाजूला बाबाचे पुतणे मुकुंदराव व दलित फेडरेशनचे नेते होते. दर्शनोत्सुक जनतेला थोपवितांना ‘समता दला’ च्या सैनिकांना अतिशय जड जात होते. पोलिसांच्या पलटणीही लोकांना आटोक्यात आणण्यासाठी धडपडत होत्या. दलित जनतेला काबूत आणणे कठीण जात होते. आदल्या दिवसापासून तिष्ठत असलेल्या आणि क्षणाक्षणाला वाढत असलेल्या त्या प्रचंड समुदायाचा धीर आता सुटत चालला होता. अक्षरश: ओक्साबोक्शी रडत हे स्त्री-पुरुष ‘राजगृहा’च्या कुंपणावर लोटत होते. तरीसुध्दा ‘राजगृहा’ भोवतालच्या परिसरात एवढाही गोंधळ गर्दी आढळून येत नव्हती. ‘समता दैनिक दला’ च्या सैनिकांनी शेवटी लोकांच्या रांगा करण्यात यश मिळविले. या रांगा मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनपासून रुईया महाविद्यालयाला वळसा घालून ‘राजगृहा’ च्या प्रवेशद्वारापाशी पोहोचल्या होत्या.
नवयुग-मराठा तर्फे पुष्पाजंली...!!!
सकाळी साडेसात वाजल्यानंतर सर्व पक्षांचे मान्यवर नेते अत्यंदर्शनासाठी व पुष्पांजली अर्पण करण्यासाठी येऊ लागले. हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र कमिटीचे अध्यक्ष कॉ. मिरजकर, समाजवादी पक्षाचे नेते रोहीत दवे व हॅरीस,मिल मजदुर पक्षाचे बापूराव जगताप आदि मंडळी सकाळी पुष्पहार अर्पण करून गेली. साडेआठच्या सुमारास आचार्य अत्रे येऊन त्यांनी दैनिक ‘मराठा’व साप्ताहीक ‘नवयुग’ तर्फे बाबासाहेबांच्या पार्थिव देहाला पुष्पाजंली वाहिली. बाबासाहेबांचे अत्यंदर्शन घेतांना आचार्य अत्रे यांचे डोळे पाणावले. हे पाहून भोवतालच्या मंडळींना शोकावेग आवरणे कठीण गेले.
स्मृतीला अभिवादन...!!! 
श्री. नाना पाटील त्यादिवशी साताऱ्याला होते. त्यांना ही दु:खद वार्ता समजताच ते ताबडतोब मुंबईस निघून आले. त्यांनीही बाबांच्या स्मृतीला अभिवादन केले. कॉ.डांगे येथे नसल्यामुळे त्यांच्या वतीने सौ. उषाताई डांगे व कन्या यांच्यासह येऊन त्यांनी पुष्पहार अर्पण केला. बाबासाहेबांच्या या जुन्या सहकाऱ्याने बाबासाहेबांच्या पुष्पशेजेवर शीर नमवितांच तिथे गंभिर शांतता पसरली.
‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’ चे कार्यवाह श्री. राम मोहाडीकर ‘रुपारेल महाविद्यालया’ चे प्राचार्य चि. व. जोशी, ‘सिध्दार्थ’ चे डॉ. हेमंत कर्णिक, प्रा. अनंत काणेकर आदि नामवंत मंडळींनी पुष्पहार अर्पण केले.
जगातल्या कोणत्याही सामर्थ्यापेक्षा, राज्यसत्तेपेक्षांहि मानवी अंत:करणातल्या भावना किती शक्तीमान, तेजस्वी व स्थलकालाची, अंतराची बंधने जुमानत नसतात. यांचे प्रत्युतर मुंबईच्या जनतेला ता. ३। ११। ५६ ला दिसून आले.  बाबासाहेबांच्या परिनिर्वाण यात्रेसाठी जो दहा लाखांचा जनसागर त्यादिवशी गोळा झाला होता त्याने काही तास तरी मुंबइंचे सारे यांत्रिक जीवन स्थगितच केले होते. ज्या ज्या भागातून मिरवणूक गेली त्या त्या भागातील सारे व्यवहार बंद पडले होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माणसे धावत होती.
एखाद्या नदीला पुराचा लोंढा यावा त्याप्रमाणे लोकांच्या झुंडी रत्यावरून धावताना दिसत होत्या. जनसागराच्या भावनांचे जे विराट दर्शन दादर चौपाटीच्या परिसरांत पाहायला मिळाले, ते पाहिल्यानंतर ही भावनांची शक्ति जगातल्या कोणत्याही अन्यायी शक्तिपुढे कधीच मान तुकवणार नाही याचा साक्षात्कार सर्वाना झाला.
(दै. मराठाच्या ७ डिसेंबर १९५६ च्या अंकातून साभार)

छत्रपती संभाजीराजांचा अंत्यविधी पूर्वाश्रमीच्या महारांनीच केला....!!!

 छत्रपती संभाजीराजांचा अंत्यविधी पूर्वाश्रमीच्या महारांनीच केला....!!!
खरा इतिहास दडविण्याची.. खोटा इतिहास लिहिण्याची.. आणि खोट्या इतिहाचा प्रचार आणि त्याला बळकटी देण्याची महान परंपरा आपल्या देशात चालत आलेली आहे.. 

असो, आपल्या देशात महापुरुषांना जातीमध्ये विभागले असून त्याला सारेच जबाबदार आहेत. प्रत्येक महापुरुषांनी सर्व जातीधर्मांच्या कल्याणासाठी खस्ता खालल्या... सर्वांचे मंगल आणि हित साधले... पण, केवळ अमुक महापुरुष आपल्या जातीचा आहे नां.. मग त्याच्यावर आमचीच मालकी... असा पायंडाच पडलेला आहे.. 


याठिकाणी आज चर्चा करायची ती मराठा तरुणांबद्दल. महाराष्ट्रातील गावखेड्यात मराठा समाजाने आपल्या लहान भावंडाविषयी ( पूर्वाश्रमीचे महार व आत्ताच्या बौद्धांविषयी ) एवढा द्वेष का बाळगलाय? हेच समजत नाही.


इथे हे लिहिण्याचे कारण हे की, मराठ्यांनी कधी महारांना समजून घेतलेच नाही.. अलिकडे मराठा सेवा संघ, संभाजीराजांच्या नावे सुरू झालेले ब्रिगेड संघटनांनी परिवर्तनवादी भूमिका घेतली आहे. व्यासपीठावर ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत आहेत. आता फोटोही लावत आहे (फक्त व्यासपीठावर). पण, ही बाब आजही या समाजातल्या तरुणांना खटकत आहे, तुम्ही बाबासाहेबांचे नाव का घेता... फोटो कशाबद्दल लावता, असे खडे बोल ते त्यांच्या पुढारी म्हणा की वक्त्यांना बोलत आहेत. हे खुद्द संभाजी ब्रिगेडचे प्रदीपदादा सोळुंके यांनीच माझ्याशी बोलताना सांगितले. बाबासाहेबांची एवढी अ‍ॅलर्जी का बरं, असे विचारले तर प्रदीपदादा म्हणतात सुरूवात तर झाली नां... हळूहळू होईल सारे सुरळीत..?


असो, मुद्यावर येऊत..... 

१६८९ च्या सुरवातीला संभाजीराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे बोलावले. ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. या कारवाईसाठी गणोजी शिर्केने कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठा सैन्य आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठयांचे संख्याबळ कमी होते.प्रयत्नांची शिकस्त करूनही मराठा सैन्य शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहित. आप्तस्वकीयांनी दगाबाजी केल्याने संभाजीराजे आणि गुरू कवी कलश या दोघांना औरंगजेबच्या सैन्यांनी जिवंत पकडले....

त्यांना औरंगजेबापुढे तेव्हाचे बहादूरगड आताच्या धर्मवीरगड येथे आणण्यात आले. बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. पुढे औरंगजेबाने आपला मुक्काम पुणे जिल्ह्यातील तालुका शिरूर येथील ‘‘तुळापूर'' येथे हलवला. तीथे तुळापूरला भीमा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावर या महान तेजस्वी राजाच्या शरीराचे अक्षरश: तुकडेतुकडे करून अमानुषपणे त्यांची हत्या केली.... कवी कलशलाही तिथेच हालहाल करून मारले...  आतिशय निर्दयपणे शंभूराजा व   कवी कलश यांचा छळ करण्यात आला, त्यांचे डोळे काढले गेले, जीभ खेचून काढण्यार आली, नखे ओढून काढली, शरीरावर अमर्याद असे घाव केले .. त्यांचा मृत्यू येई पर्यंत औरंजेब त्यांच्यावर अत्याचार करतच राहिला, पण हा सह्याद्रीचा छावा जरा हि डगमगला नाही .. थोडा हि बिचकला नाही. आपल्या शेवटच्या श्वास पर्यंत त्यांनी औरंजेबापुढे आपली माण झुकवली नाही... मरणालाही शतदा लाज वाटेल अशा क्रूर आणि पाशवी पद्धतीने या दोघांचा वध करण्यात आला. तेव्हा तुळापूर आणि लगतच्या वढू गावात भयाण दहशत पसरलेली होती... एकिकडे औरंगजेबचे सैन्य हे संभाजीराजे आणि कवी कलशच्या अंत्यविधीसाठी कोणी बाहेर आले तर त्याचीही खैर नाही, अशा धमक्या देत होते... चिटपाखरू घराबाहेर पडायला तयार नव्हते... तेव्हा वढू गावातील शूरपराक्रमी महारांना धाडस केले... जमीनीवर पडलेल्या आपल्या राजाचे धड व शरिराच्या अस्ताव्यस्त पडलेल्या तुकड्यांची विटंबना होऊ नये म्हणून जीवाची पर्वा न करता त्या गावातील महारांनी राजा छत्रपती शंभूचे सर्व तुकडे जमा करून महारवाड्यालगतच त्या तेवढ्याच सन्मानाने अंत्यविधी केला..!!!  आजही संभाजी राजांची समाधी वढू गावच्या महारवाड्यालगत आहे...
     असे असतानाही केवळ शंभूराजा आणि शिवबाच्या नावाचा जयघोष करणारे आमचे मोठे बांधव आजही गावागावातल्या महारांना वेठीस धरून त्यांच्यावर राजरोसपणे अत्याचार करत आहेत... कधी त्यांची घरे जाळून तर कधी दलित तरुणांचे डोळे काढून तर कधी 

खैरलांजीसारखी घटना घडवून स्वत:ला धन्य समजताहेत. का? कशासाठी?जरा इतिहासाची पानेही चाळा कधी तरी बांधवांनो... आणि मग कळेल, महारांची शौर्यगाथा...!


The Mahar Regiment is an Infantry Regiment of the Indian Army.         
(विजय सरवदे, औरंगाबाद, यांच्या ब्लॉग वरून साभार )

बोधिसत्व म्हणजे काय? ते कसे प्राप्त होते ?


                         बोधिसत्व म्हणजे काय? ते कसे प्राप्त होते ?

आपण म्हणतो " बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा.....विजय असो". कारण आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  बोधिसत्व बाबासाहेब असे संबोधतो. पण आपण कधी विचार केला का ? बोधिसत्व म्हणजे काय? ते कसे प्राप्त होते?
"१०  पारिमितांचे  पालन  करणे म्हणजेच बोधिसत्वाकडे स्थित्यांतर सुरु होणे." बोधिसत्व प्राप्त होण्यासाठी त्या व्यक्तीने दहा पारिमितांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. 
१०  पारिमितां म्हणजे  काय ?
१) शील :- शील म्हणजे नितिमत्तापापभिरुतावाईट गोष्टी न करणेअपराध करण्याची लाज वाटणे.
२) दान :- म्हणजे निस्वार्थपरोपकार अर्थात तनमन धनानी दुस-याची भलाई करणे.
३) उपेक्षा :- म्हणजे आप्तिताअनासक्तिआवड-नावड नसणेफलप्राप्तिने विचलीत न होणेनिरपेक्षतेने सतत प्रयत्नशील  
                राहणे.

४) नैष्क्रम्य :- म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग करणे.

५) वीर्य :- योग्य प्रयत्न करणे,  हाती घेतलेले काम माघार न घेता पूर्ण सामर्थ्याने पूर्ण करणे.

६) शांती :- म्हणजे क्षमाशीलतातद्वेषाला द्वेषाने उत्तर ने देणे. द्वेषाने द्वेष शमत नसून क्षमाशीलतेने शमते.

७) सत्य :- कधीही खोटे न बोलणेकोणाचीही चुगली न करणेकोणाचीही निंदा नालस्ती न करणे.

८) अधिष्ठान :- ध्येय गाठण्याचा द्रृढ निश्चय म्हणजे अधिष्ठान.

९) करुणा :- समस्त प्राणिमात्रा विषयी प्रेमपुर्ण व दयाळू व्यवहार म्हणजे करुणा होय.

१०) मैत्री :- प्राणिमात्रमित्रशत्रू ते सर्व जीव जंतू बद्दल बंधूभाव बाळगणे म्हणजे मैत्री होय.

वरील दहा पारिमितांचा सराव करता करता बोधिसत्वाची स्थीती सुरु होते. ती सुद्धा दहा टप्य्यात असते. हे दहा टप्पे म्हणजे बोधिसत्वाची अवस्था. एकदा का हे दहा टप्पे पुर्ण झाले की मग जी अवस्था प्राप्त होते तीला बुद्धत्व म्हणतात.
दहा पारिमितांच्या सरावाने बोधिसत्व प्राप्त करुन देणारे ते दहा टप्पे कोणते ते पाहू या.
पायरी: १) मुदिता:-  आनंदर प्राप्त करुन घेतो,  सर्व पाणिमात्रांच्या कल्याणाची तळमळ लागते.
पायरी: २) विमलता:- कामवासनेचे सर्व विचार काढून टाकणे आणि दयाशील बनने.
पायरी: ३) प्रभाकारी:- अनात्म व अनित्याचे आकलन होते, बुद्धी सतेज होऊन सर्वोच्च ज्ञानाची ईच्छा होते, तो कशाचाही त्याग करण्यास तयार होतो.
पायरी: ४) अर्चिस्मती:- अग्नी प्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता मिळवतो, अष्टांग मार्गाचे अनुसरण करतो, चतुर्विध ध्यान व व्यायाम करुन इच्चाशक्तीच्या बळावर पंचशिलेचे अनुकरण करतो.
पायरी: ५) सुदुर्जया:- त्याला सापेक्ष व निरपेक्ष याचे ज्ञान प्राप्त होते.
पायरी: ६) अभिमुखी:- अविद्येने अंध असलेल्या व्यक्ती विषयी अगाध करुणा बाळगणे.
पायरी: ७) दूरगमा:- अनंताशी एकरुप होतो. मोह, माया, तृष्णेपासून अलिप्त होऊन परोपकार, सहनशीलता व व्यवहार चातुर्य मिळवितो. शक्ती, शांती, बुद्धी(प्रज्ञा) चा संपुर्ण अभ्यास व धर्माचे ज्ञान होते.
पायरी: ८) अचलावस्था:- जे जे चांगले आहे ते सर्व स्वाभाविकताच करतो. जी जी गोष्ट करेल त्यात यशस्वी होतो.
पायरी: ९) साधुमती:- ही स्थीती अत्यंत महत्वाची असून, या स्थीतीत उपासकास धर्म, शास्त्र, दिशा  जगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते.
पायरी: १०) धर्ममेथ:- या स्थीतीत बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टि प्राप्त होते.
अशा प्रकारे दहा पारिमितांचे पालन करता करता साधक बोधिसत्वाच्या एक एक पाय-या चढायला सुरुवात करतो. एक एक टप्पा पार करायला कित्येक वर्षे जावी लागतात. दहा पारिमिताचा पाया जेवढा भक्कत तेवढी बोधिसत्वाच्या पाय-या ओलांडण्याची गती जास्त.
बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर दहा पारिमितांचे पालन करत करत बोधिसत्व बनले. ते आजून काही वर्ष जगल्यास त्याना बुध्दत्व प्रात झाल्यावाचून राहिले नसते...!!!
(आभार - एम. डी. रामटेके)

थोडीशी गम्मत केली रे....!!!

 थोडीशी गम्मत केली रे....!!!
वा रे वा मराठी हुशारी...!!!

एकदा बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट साठी नवा चेअरमन शोधायचा असतो..!!!

तो तशी पेपरात एड देतो...!!!
५००० जन इंटरव्यूसाठी येतात...!!

त्यातला एक असतो आपला “प्रमोद ”

बिल गेट्स :धन्यवाद आल्याबद्दल
(आता बिल गेट्स हे सर्व इंग्लिश मध्ये बोलतो पण मी ट्रान्सलेट करून लिहीत आहे समजदार समजून जातील)

ज्यांना कोणाला “जावा” लेन्ग्वेज येत नाही त्यांनी रूम सोडावी...!!!

लगेच २००० लोक कमी होतात...!!

प्रमोद (मनातल्या मनात):मला “जावा” तर येत नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!

बिल गेट्स:ज्यांना कोणाला १०० लोक एकाचं वेळेस मेनेज करायचा अनुभव नसेल त्यांनी रूम सोडावी...!!!

लगेचच २००० लोक बाहेर जातात..!!

प्रमोद (मनातल्या मनात):मी कधीच कोणाला मेनेज केले नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!
आणि तो थांबतो...!!!

बिल गेट्स: ज्या कोणाजवळ एम.बी.ए. डिग्री नाही त्यांनी बाहेर जावे...!!!

लगेचच ५०० लोक बाहेर जातात...!!!

प्रमोद (मनातल्या मनात):मी शाळा १५ वर्षांचा असतांनाच सोडली पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!

आणि शेवटी
बिल गेट्स:ज्यांना कोणाला सेब्रो कोट ही भाषा बोलता येत नाही त्यांनी बाहेर जावे...!!!

मग काय ४९८ लोक निघून जातात...!!!

प्रमोद (मनातल्या मनात):मला सेब्रो कोट भाषेतील एकाही शब्द येत नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!
आणि तो थांबतो...!!!

आणि शेवटी प्रमोद आणि फक्त एक जन तेथे शिल्लक राहतो...!!!

बिल गेट्स त्या दोघांजवळ येतो आणि बोलतो,तुम्हा दोघांना फक्त सेब्रो कोट ही भाषा येते तर बोला एकमेकांशी...!!!

शांतपणे प्रमोद वळतो आणि बाजुच्याला विचारतो...!!

प्रमोद :कुठून आला आहेस...???

तो दुसरा हळूच हसत बोलतो....
.
.
“महाराष्ट्रातून”

 कोंबडी कोणी पळवली…???

मनमोहन सिंग – कोंबडी चोरीच्या घटनेची मी कठोर शब्दात निंदा करतो. सर्वांना मी शांततेचे आवाहन करतो.

पी. चितंबरम - यात परकीय शक्तींचा हात आहे का? याची तपासणी चालू आहे.

दिग्विजयसिंह – कोंबडी पळवण्याच्या मागे संघाचा हात आहे.

अण्णा हजारे – जर कोंबडी आणि कोंबडी चोर हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सापडले नाही तर, मी पुन्हा ‘आमरण उपोषणाला’ बसेन.

रामदेवबाबा – कोंबडी पळवणे म्हणजे देशद्रोह आहे. अरे! जर कोंबडी सापडली नाही. तर अंडी कोठून मिळणार? आणि देश स्वस्थ कसा राहणार?

अटलबिहारी वाजपेयी – कोंबडी पळवणे… ही.. चांगली गोष्ट नाही. मी सरकारला… अनुरोध.. करेन की…. त्यांनी लवकरात लवकर… त्या कोंबडी चोराचा छडा.. लावावा.

अजित पवार – मी कोंबडी पळवली नाही. माझ्या वाटेला जाल तर याद राखा.

लालू प्रसाद यादव – अरे मुर्गी थो चोरी हुई है न! मिल जायेगी| भेस थोडी है जो नीतीस के घर जायेगी....!!!

राज ठाकरे – जर कोंबडी मराठी असेल तर, कोंबडी चोराला तंगडी धरून लंगडी घालायला लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

उद्धव ठाकरे – गेल्या चाळीस वर्षापासून आम्हीच कोंबडी चोरीचा मुद्दा मांडत आलो आहोत. इतरांनी नाक खुपसू नये.

आर आर पाटील – मोठ्या शहरात अशा छोट् छोट्या घटना घडत असतात. परंतु, कुणीही कायदा हातात घेऊ नये..

(आंतरजालावरून साभार)

"ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार....! जय हो..!"

1) "बघतोस काय ? मुजरा कर .....!"
2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
3) "बघ माझी आठवण येते का ?"
4) ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''
5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
6) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
7) तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
8) 'अहो, इकडे पण बघा ना...'
9) "हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".
10) थांब लक्षुमी कुंकू लावते!
11) तुमचे लक्ष आमच्याकडे का?
12) "लायनीत घे ना भौ"
13) चिटके तो फटके!
14) राजे तुम्हि पुन्हा जन्माला या
15) अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा, सनिव्हेल, फ्रिमॉन्ट्, हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
16) १३ १३ १३ सुरूर !
17) "नाद खुळा"
18) "हाय हे असं हाय बग"
19) आई तुझा आशिर्वाद.
20) "सासरेबुवांची कृपा "
21) "आबा कावत्यात!"
22) पाहा पन प्रेमाणे
23) नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.
24) "हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"
25) अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.
26) हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...
27) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..
28) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.
29) गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
30) हेही दिवस जातील
31) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा
32) घर कब आओगे?
33) १ १३ ६ रा
34) सायकल सोडून बोला
35) हॉर्न . ओके. प्लीज
36) "भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"
37) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)
38) तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं
39) माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा
40) बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये--
सुसाईड मशिन
मिसगाईडेड मिसाईल
मॉम सेज नो गल्स
41) एका ट्रक च्या मागे लिहले होते:
राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
42) एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल"
खाली लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)
43) अजस्त्र डंपरच्या पाठीमागे
उगीच हॉर्न वाजवू नये, तुला चिरडायला एक सेकंद पुरेल
44) एका टेम्पोच्या मागे..
आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद! 
(आंतरजालावरून साभार)

एक विनोद, निखील वागळे साहेबांनसाठी.....!!!

एकदा वागळे साहेब आजचा सवाल संपऊन घरी येतात घरातले वातावरण गरम दिसते श्रिमती रागावलेल्या असतात,
श्रिमती : रोज राञी 12 , 1 वाजतात यायला तुम्हाला, आमची तर काही काळजीच नाही बुवा जेव्हा बघाव तेव्हा हातवारे करत बातम्या देता राञी झोपत पण भाई 1 मिनिट थांबा, चांदुलकर पुर्ण करा, अण्णा बोला बोला, मेधा ताई याच ऊत्तर द्या अशी नाव घेता माणसाला झोप म्हणुन येऊ देत नाही

वागळे(हातवारे करत)
काय मागण्या आहेत आपल्या ?
यावर आपणाला शांततेच्या मार्गाने उपाय काढता येणार नाही का ?

श्रिमती
मलाही वाटते तुम्ही कधी तरी प्रेमाचे दोन शब्द बोलावे माझ्याशी, एखादी छानशी चारोळी लिहावी माझ्यासाठी, पण तुमच आपल फक्त आँफिस आणि बातम्या हं हं हअअअअअअ

वागळे
ठिके, अहो तुम्ही रडु नका
यावर उपाय आहे
मला उत्तर देऊ द्या
ब्रेकवर जाण्यापुर्वी माझा प्रश्न पहा
घरातील लोकांना मि वेळ देत नाही हा आरोप योग्य आहे का ?
होय म्हणतात 99 टक्के लोक,
जनता श्रिमतीच्या बाजुने आहे ब्रेकवर जाणापुर्वी माझे ऊत्तर देखील ऐका, श्रिमतीजीँसाठी एक चारोळी,

तेरे प्यार मेँ लिखे मेँने हजारे खत
ते रे
तेरे
तेरे प्यार मेँ लिखे मेँने हजारे खत
.
..
.
अचुक बातमी ठाम मत पहा फक्त आयबीयन लोकमत...!!!

(साभार - अशक्य पांचट
)

आपल्या लाइफसाठी काही खास म्हणी.....!!!

राहायला नाही घर म्हणे लग्न कर...              

सासू क्लबमध्ये सून पबमध्ये...                  

खिशात नाही डोनेशन, घ्यायला      चालला ऍडमिशन...!!!

चुकली मुलं सायबरकॅफेत 

चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !!! 
  
नाजुक मानेला मोबाईलचा आधार   
  
जागा लहान फ़र्निचर महान !!!!!

ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !!!!!

उचलला मोबाइल लावला कानाला

रिकाम्या पेपरला जाहिरातींचा आधार

काटकसर करून जमवलं, इन्कम टॅक्समध्ये गमावलं

मनोरंजन नको रिंगटोन आवर.

स्क्रीनपेक्षा एसएमएस मोठा.

रोगी सलामत तो, तपासण्या पचास

एकमेका कॉपी देऊ , अवघे होऊ उत्तीर्ण

डॉक्टर, वकील, तलाठी आप्पा, तुमचे दर्शन नको रे बाप्पा

लाच खाणार, त्याला सीबीआय नेणार

घरोघरी फॅशनेबल पोरी.        

गरज सरो आणि मतदार मरो

कॉल आला होता पण नोकरी आली नव्हती.

सचिनची शंभरी आणि क्रिकेटची पंढरी

मरावे परी व्हिडिओरूपी उरावे.

घाल खादी, नि हो नेता

नाव सागर, डोक्यावर घागर 
   मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !!!

पुरुषाचा जन्म कित्ती छान.....!!!
महिलांनो, विचार करा पुरुषाचा जन्म किती सुखाचा! तुम्ही पुरुष असलात तर...

१. तुमचं आडनाव बदलत नाही.
२. तुम्हाला गरोदर राहायची भीती नाही.
३. वॉटर पार्कमध्ये व्हाइट टी शर्ट घालून बागडू शकता.
४. वॉटर पार्कमध्ये टी शर्ट न घालताही बागडू शकता.
५. बाइक/कारचे मेकॅनिक तुमच्याशी खरं बोलतात.
६. स्क्रू कोणत्या बाजूला पिळायचा, असा प्रश्न तुम्हाला पडत नाही.
७. बाईएवढेच काम करून तुम्हाला जास्त पगार मिळतो.
८. गालावरच्या सुरकुत्या तुम्हाला आदर मिळवून देतात.
९. लोक तुमच्याशी बोलताना तुमच्या चेह-याकडेच पाहतात.
१०. तुमचा एक मूड बराच काळ टिकतो.
११..तुमचा एक फोन अर्ध्या मिनिटाच्या वर चालत नाही.
१२..पाच दिवसांच्या सुटीसाठी बाहेर जाताना फक्त एका सुटकेसमध्ये सामान मावतं.
१३ .तुम्ही फडताळातून डबे स्वत:चे स्वत: काढू शकता.
१४ .कोणत्याही डब्याचं झाकण स्वत: उघडू शकता.
१५..पादत्राणांचे तीन जोड पुरतात.
१६ .बिनधास्त शॉर्ट वापरू शकता.
१७ .तुम्ही पाच जणांच्या कुटुंबासाठीची संपूर्ण कपडेखरेदी केवळ पाच मिनिटांत उरकू शकता.
१८ . तुमचं पोट सुटलं तर कोणी काही बोलत नाही.

मित्रानो, प्रत्येक गोष्टीत स्त्रियांना आपण कमी लेखतो, प्रत्येक गोष्टीत त्यांचाशी पुढे असण्याच भ्रमिक सुख आपल्याला खूपच प्रिय असते, त्यांची टिंगल उडवायला मुळीच काही वाटत नाही! आपल्या मते दोष म्हंटला तर नेहमी त्यांचाच असतो, होना ???
पण खरतर चुकतो आपण..
स्त्री च्या रुपात आई असो, बहिण, बायको, पुत्री किवा प्रेयसी त्यांचा आदर केलाच पाहिजे, त्यांचा भावनांची कदर समजून घ्यायला पाहिजेच...
खरच हो, त्यांचा इतपत धैर्य, सहनशक्ती आणि त्याग करण्याची शक्ती आपल्यात नाहीये हे नेहमी लक्षात ठेवून हे विचार केल पाहिजे कि आपण खूप खूप खूपच नशीबवान आहोत, पुरुष म्हणून जन्माला आलोय...!!! 
(आंतरजालावरून साभार)
                                               

जाणता राजा शाहू महाराज.......!!!


जाणता राजा शाहू महाराज.......!!! 


आज 26 जून राजर्षी शाहू महाराज यांची जयंती.फुले-शाहू-आंबेडकर हे आधुनिक महाराष्ट्राचे, पुरोगामी महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या एकूण समाजकारणावर जातवास्तवाचा मोठा प्रभाव असल्यामुळे महापुरुषांचा नामोल्लेख करतानाही अनेकांची अडचण होताना दिसते. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत काही वर्षापूर्वी ‘फुले-आंबेडकरांचा’महाराष्ट्र असा उल्लेख करायचे. हीच मंडळी कोल्हापुरात आल्यावर त्यात शाहूंचे नाव समाविष्ट करत. म्हणजे कोल्हापूरच्या बाहेर शाहूंना फुले-आंबेडकरांच्या बरोबरीने स्थान दिले जात नव्हते. राज्यकर्त्यांचेही यापेक्षा वेगळे काही नव्हते. परंतु कांशीराम-मायावती यांनी उत्तरप्रदेशातील सत्तेत असताना फुले-आंबेडकरांच्याबरोबरीने राजर्षी शाहूंना स्थान दिले, त्यानंतर महाराष्ट्राच्या पातळीवरही शाहूंचे नाव घ्यायला सुरुवात झाली आणि आज ते रूढ झाले. हे सगळे पुन्हा जाती-पातीच्या समाजकारणाशीच संबंधित आहे. महात्मा फुले माळी समाजाचे दैवत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचे दैवत बनले. राजर्षी शाहू महाराज यांना स्वीकारणे मराठा समाजासाठी तेवढे सोपे नव्हते. आजही नाही. आजही मराठय़ांना शाहू महाराज अडचणीचेच वाटतात. देशात आरक्षण ही संकल्पनाच राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली, आपल्या संस्थानात मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय 1902 मध्ये घेतला होता. वेगवेगळ्या नावांनी काम करणाऱ्या मराठा संघटना आज शिवाजी महाराज,जिजाऊ यांची नावे घेतात, परंतु शाहू महाराज अनेकांना अडचणीचे वाटतात. कारण शाहू महाराजांना स्वीकारले, तर आरक्षणाचे समर्थन करावे लागते. आणि आरक्षणाचे समर्थन करून मराठय़ांचे संघटन करता येत नाही.


सामाजिक बंधुभाव, समता, दलित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला व क्रिडा, आरोग्य आदी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी ज्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज, पारतंत्र्य, दुष्ट रूढी परंपरा, निरक्षरता, अज्ञान इत्यादी समस्यांनी ग्रासलेल्या काळात इ.स. १८७४ २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले. भारतमातेच्या पोटी अनेक थोरांनी, संतांनी, महंतांनी, राजांनी, महाराजांनी, समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोरगरीब दीन दुबळ्यांची मनोभावे सेवा केलेली आहे.

बहुजन हिताय बहुजन सुखाय हे सूत्र ध्यानात घूऊन शाहू महाराज राज्यकारभार पाहू लागले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय याची फळे सर्व समाजाला चाखता यावीत म्हणून त्यांनी आपले सिंहासनच पणाला लावले. अज्ञान अंधश्रद्धा, निरक्षरता सामाजिक दुजाभाव, दारिद्रृय यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी महाराजांनी आपला खजिना सताड उघडला. 


छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव, समता, दलित, बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते. सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.


शंभर वर्षापूवी शाहूराजांनी ज्या दूरदृष्टिने निर्णय घेतले, त्याच्या जवळपासही आजचे राज्यकर्ते जाऊ शकत नाहीत. मानवी जीवनाच्या विकासाचे असे एकही क्षेत्र नाही, ज्यासाठी महाराजांनी काम केले नाही. उस्ताद अल्लादिया खाँ साहेबांना त्यांनी कोल्हापूरला आणल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते असल्याचे त्यांनीच माणगावच्या परिषदेत जाहीर केले. सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राधानगरी धरण बांधून सिंचनाची सोय केली. कुस्तीला प्रोत्साहन दिले. कोल्हापुरात प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करून उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारक कार्य केले. फासेपारध्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी राबवलेली बांधकाम योजना राज्यकर्त्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरणारी आहे. हे सगळे करीत असताना समाजातील विशिष्ट वर्गाशी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. संघर्ष करतानाही त्यांनी विकासाची वाट आणि तळागाळातील घटकांप्रती असलेली बांधिलकी याचा कधी विसर पडू दिला नाही. प्रस्थापितांनी त्यांच्या बदनामीच्या कहाण्या रचल्या. परंतु नव्या पिढीतल्या इतिहास संशोधकांनी त्या कहाण्या म्हणजे हितसंबंध दुखावलेल्या मंडळींनी रचलेली कुभांडे असल्याचे सिद्ध केले आहे.  

बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.

८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ पेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला. १९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.

राजर्षी शाहू महाराजांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, लिंगायत आदी सर्वच जातीतील-पंथातील विद्वान, पंडीत, शिक्षित, अशिक्षित, मल्ल, शिकारी, गायक, चित्रकार, शाहीर, कारागिर, तमासगीर या सर्वावर निव्र्याज भावनेने प्रेम करून त्यांना त्यांच्या विकासासाठी व उद्धारासाठी सर्वप्रकारची मदत देत. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली व त्यानंतर ‘मूकनायक’ साप्ताहिक पूर्ववत सुरु राहिले.२० मार्च १९२० रोजी करवीर राज्यातील ‘कागल’ जहागिरीतील ‘माणगांव’ या ठिकाणी अस्पृश्यांची पहिली ऐतिहाकि परिषद शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून व प्रेरणेने आयोजित केली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब होते.

‘माझे राज्य गेले तरी बेहत्तर, अस्पृश्योद्धाराचे कार्य थांबविणार नाही’महाराजांच्या अशा कार्यामुळे अस्पृश्य जनता शाहूंना आपला त्राता, उद्धारक, मित्रच नव्हे तर प्रत्यक्ष देव मानीत होते. ह्य़ामुळे महाराज व बाबासाहेब याचा स्नेह वाढत गेला.


क्रूर रूढी आणि प्रथांना पायबंद, हुंड्यांची भयानक रुढी, दारुचे दुष्परीणाम, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक ऐक्य, स्वदेशीचा आग्रह व प्रचार, बालविवाहाचे दुष्परीणाम असे लोककल्याणकारी विषय घेऊन समाज घडविण्यासाठी महाराजांनी अथक परिश्रम घेतले. त्यासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही. 

दुष्काळावर मात करण्यासाठी त्या काळी रोजगार हमी योजना सुरु केली आणि त्या योजनेतून रस्ते, तलाव, पूल बांधून घेतले. मजूरांच्या लहान मुलांसाठी शिशु संगोपन गृहे उघडली. अपंग, अनाथ, आजारी वृद्धांसाठी अनेक ठिकाणी निराधार आश्रम सुरु केले. प्लेग या भयानक रोगापासून स्वसंरंक्षण कसे करावे त्यावर काय उपाय करावे याची माहितीपत्रके छापून लोकांचे अज्ञान दूर केले. सामान्य गरीब जनता माणूसकीला पारखे झालेले दलित बांधव यांना जागृत करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे रहण्यास अथक प्रयत्न करुन महाराजांनी त्यांना प्रगतीप्रथावर नेले. अधर्मावर, दुष्ट आणि क्रूर रुढी परंपरांवर कठोर प्रहार करुन मानव धर्माचा, माणूसकीचा, सामाजिक समतेचा, लोककल्याणाचा वृक्ष त्यांनी बहरत ठेवला. राजा असूनही ते लोकांसाठी, समाजासाठी राजऋषीसारखे जगले. 

करवीर राज्याचे उत्पन्न कमी असल्याने नोकरशाहीच्या हातून शाहू महाराजांनी सत्तासूत्रे आपल्या हाती घेऊन प्रशासन यंत्रणेवर वचक बसविण्यासाठी ‘हुजूर कार्यालयाची’ स्थापना केली. महाराजांची ही कृती म्हणजे नोकरशाहीच्या मक्तेदारीला लावलेला सुरूंगच होता. ‘कुस्तीची पंढरी’ कोल्हापूरला बनविण्याचे श्रेय हे केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. म्हणजे कोल्हापूरच्या मातीत ‘मल्लविद्या’ रुजविण्याचे, जोपासण्याचे व वाढविण्याचे काम त्यांनी केले. १८९५ साली ‘मोतीबाग तालीम’ची स्थापना केली. त्या ठिकाणी प्रवेशव्दारावर एक पाटीवर लिहीले होते. ‘पहिली शरीरसंपत्ती दुसरी पूत्रसंपत्ती व तिसरी धनसंपत्ती असेल तोच पुण्यवान’ म्हणजे महाराजांचे क्रिडा क्षेत्राविषयीची आस्था येथे दिसते. पुढे जाऊन ३१ जुलै १८९७ रोजी जेव्हा त्यांना पुत्ररत्न झाले. त्यावेळी त्यांनी एक जंगी स्पर्धा ठेवली होती. त्या स्पर्धेत देशभरातील सर्व मल्ल आले होते. असा हा महान कीर्तीवंत राजा राजर्षी शाहू महाराज ६ मे १९२२ ला अनंतात विलीन झाला. अशा थोर
लोकराजा राजर्षी शाहु महाराजांना जयंतीनिमित्त अँड.राज जाधव यांच्यातर्फे मानाचा मुजरा...!!!

Monday 25 June 2012

जो बौद्ध आहे तो... !!!

जो बौद्ध आहे तो... !!!


जो बौद्ध आहे तो देव या कल्पनेवर विश्वास ठेवत नाही.

जो बौद्ध आहे तो हिंदू धर्मातील देव - देवता मानत नाही.

जी महिला बौद्ध आहे ती देवाचा उपवास करीत नाही.

जो बौद्ध आहे तो भूत मंत्र चमत्कार यावर विश्वास ठेवत नाही.

जो बौद्ध आहे तो प्राणी हत्या करीत नाही.

जो बौद्ध आहे तो चोरी करीत नाही.

जो बौद्ध आहे तो व्यभिचार करीत नाही.


जो बौद्ध आहे तो खोटे बोलत नाही.


जो बौद्ध आहे तो दारू सिगरेट तंबाखू इत्यादी व्यसन करीत नाही.


जो बौद्ध आहे तो तथागत भगवान बुध्दांनी सांगितलेल्या मार्गाचा पालन करतो.


जो बौद्ध आहे तो दुसऱ्यांची निन्दा करीत नाही.


जो बौद्ध आहे तो दुसऱ्यांशी आदराने बोलतो.



जो बौद्ध आहे तो दुसऱ्यांचा मंगलहोण्याची भावना मनात ठेवतो.


जो बौद्ध आहे तो पैसा, शिक्षण यांचा गर्व करीत नाही.


जो बौद्ध आहे तो सर्व लोकांवर समान मैत्री करतो.


जो बौद्ध आहे तो वाईट माणसांशी मैत्री करीत नाही.


जो बौद्ध आहे तो धाम्मदान करतो.


जो बौद्ध आहे तो आपल्या मुलांना चांगले संस्कार देतो.


जो बौद्ध आहे तो आई वडिलांची सेवा करतो.


जो बौद्ध आहे तो स्त्रियांना समान वागणूक देतो.


जो बौद्ध आहे तो आपल्या पत्नीचा आदर करतो.


जो बौद्ध आहे तो आत्मा परमात्म्याला मानत नाही.


जो बौद्ध आहे तो आई वडील मरण पावले असता डोक्याचे केस कापत नाही, कावळ्यांना अन्नदेत नाही.


जो बौद्ध आहे तो घरात लिंबू नारळ बांधत नाही.


जो बौद्ध आहे तो शुभ कार्यक्रमा मध्ये दारू वाटत नाही.


जो बौद्ध आहे तो लग्नात हळद लावत नाही.


जो बौद्ध आहे तो हुंडा घेत नाही.


जी बौद्ध महिला आहे ती हळद कुंकू समारंभ करीत नाही.


जो बौद्ध आहे तो आपल्या धम्म प्रतिज्ञाचे पालन करतो....!!!