My Followers

Friday 25 May 2012

!! बावीस प्रतिज्ञा !!

                                                               
                    
                           !! बावीस प्रतिज्ञा !!


१ ) मी, ब्रह्म, विष्णु आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 

२ ) मी, राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. 

३) मी, गौरी-गणपति इत्यादी हिन्दू धर्मातील देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही 

४) देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. 

५ ) बुद्ध हा विष्णुचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो. 

६) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. 

७) मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचरण करणार नाही. 

८) मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही. 

९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो. 

१०) मी समता स्थापन्याचा प्रयत्न करीन. 

११) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा आवलंब करीन. 

१२) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमितांचे पालन करीन. 

१३) मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. 

१४) मी चोरी करणार नाही. 

१५) मी खोटे बोलणार नाही. 

१६) मी व्यभिचार करणार नाही. 

१७) मी नशायुक्त कोणत्याही पदार्थाचे सेवन करणार नाही. 

१८) प्रज्ञा , शील, व करूणा या बौद्धधम्माच्या तिन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविन. 

१९) मी, माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कार्शाला हानिकारक असनाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानना-या हिन्दू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो. 

२०) बुद्धधम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. 

२१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. 

२२) इत:पर बुद्धाच्या शिकवनुकी प्रमाने वागेन अशी प्रतिज्ञा करतो......... 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी १४ ओक्टोम्बर १९५६ साली नागपूरच्या नागभूमित आपल्याला बौद्धधम्मदीक्षा देते वेळेस या बावीस प्रतिज्ञा दिल्या. 

(जो व्यक्ति या बावीस प्रतिज्ञानुसार आपले आचरण करतो तोच बाबासाहेबांचा खरा अनुयायी आणि तोच खरा आंबेडकरवादी........!) 

तुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती...?


           तुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती...? 

                           

महात्मा ज्योतिराव फुले कुणबी, माळी, मांग, महार या जातींचा उल्लेख  एकत्रितपणे करतात, 

फुल्यांच्या संपूर्ण वाङ्मयात असे उल्लेख ठिकठिकाणी येतात. ‘ब्राह्मणांचे कसब' हा ग्रंथ फुले यांनी या 

जातींनाच अर्पण केला आहे. अर्पण पत्रिकेत फुले म्हणतात, ‘महाराष्ट्र देशांतील कुणबी, माळी, मांग, महार 

यांस हे पुस्तक ग्रंथकत्र्याने परम प्रीतीने नजर केले असे'. यावरून फुले यांची या जातींविषयी असलेली 

तळमळ दिसून येते.

आपण मराठा-कुणबी हे एक असल्याविषयीचा महात्मा फुले यांचा अधिक स्पष्टपणे समोर येणारा अभिप्राय

 पाहणार आहोत. फुले यांचे ‘शेतकरयाचा असूड' हे पुस्तक जगप्रसिद्ध आहे. हे पुस्तक लिहित असताना फुले 

यांची अनेकांशी चर्चा झाली. त्यातील दोन गृहस्थांसोबत झालेल्या चर्चेचा तपशील ज्योतिरावांनी पुस्तकाच्या 

शेवटी परिशिष्टात दिला आहे. त्यातील पहिल्या परिशिष्टाचे शीर्षक आहे ‘खासा मराठा म्हणविणाराङ्क. हे 

शीर्षकच अन्वयर्थक आहे. फुले यांची लेखनकामाठी सुरू असताना एक गृहस्थ त्यांच्या घरी येतात. 

गृहस्थांसोबत झालेला चर्चेचा तपशील फुले यांनी या परिशिष्टात दिला आहे. त्यातील काही अंश पुढे देत 

आहे-


‘‘त्यांनी (फुले यांच्याकडे आलेल्या गृहस्थाने) आपला मोहरा मजकडे फिरवून , आपणहूनच मला प्रश्न केला 


की, तुम्ही मला ओळखले नाही काय?''

मी म्हणालो, ‘‘नाही महाराज, मी तुम्हाला ओळखले नाही. माफ करा.''

गृहस्थ म्हणाला, ‘‘मी मराठी कुळातील मराठी आहे.''


मी - तुम्ही मराठे असाल, परंतु तुमची जात कोणती?''



गृ. - ‘‘माझी जात मराठे''



मी - ‘‘महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणापर्यंत लोक आहेत, त्या सर्वांसच मराठे म्हणतात. 


तरी तुम्ही अमुक जातीचे आहात याचा उलगडा तेवढ्याने होत नाही.''

गृ. - ‘‘तर मी कुणबी आहे असे समजा.''

महात्मा फुले यांनी दिलेला हा संवाद इतका स्पष्ट आहे की, मराठा आणि कुणबी या जाती एकच आहेत, हे 


सांगण्यासाठी आणखी वेगळा पुरावा देण्याची गरजच राहिलेली नाही. ‘‘महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून 

तो ब्राह्मणापर्यंत लोक आहेत, त्या सर्वांसच मराठे म्हणतात.ङ्कङ्क हे महात्मा फुले यांचे वाक्य ऐतिहासिक 

सत्य आहे. महाराष्ट्रातील फौज कोणाच्याही नेतृत्वाखाली लढली, तरी तिला मराठा फौज असेच म्हटले जात 

असे. कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यातील प्रत्येक शिपाई हा मराठा 

म्हणूनच ओळखला जात होता. पेशवाईच्या काळात मराठे पाणिपतावर लढले. तेव्हा या फौजेला कोणी 

पेशव्यांची फौज म्हटले नाही. तिला मराठ्यांची फौज असेच म्हटले गेले. आजही महाराष्ट्राबाहेर मराठी 


लोकांना मराठे असेच म्हटले जाते. त्यामुळे मराठ्यांची खरी जात कुणबी हीच आहे, हे सिद्ध होते...!!!


संत तुकारामांचा घोर अपमान....

        संत तुकारामांचा घोर अपमान....




मराठी माणसाबद्दल कायम तुच्छता पूर्वक लिहिणाऱ्या आणि त्यावर सवंग विनोद निर्मिती करून मराठी माणसाला हास्यास्पद बनवणाऱ्या पु ल देशपांडे ने महाराष्ट्राचे मानबिंदू असलेले संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची देखील कुचेष्टा केली, त्यांना देखील हास्यास्पद बनवले. परंतु बाजार बुणग्या पालखी वाहक खुशमस्कर्यानी पु ल च्या या संत द्रोहाचे सुध्धा कौतुकाच केले. 

"विठ्ठल तो आला आला " नावाचे पु ल चे एक संगीत प्रधान नाटक आहे. मुळात हें नाटक आहे की नाटिका ? हें कळायला मार्ग नाही ! मला वाटते पु ल ला संगीत नाटक लिहायचे असावे कारण या नाटकात स्वतः तुकारामाच नाही तर जो उठतो तो गायकी करतो. अगदी तुकारामांच्या पत्नी सुध्धा ! बरे यात तुकारामाच्या मुळ अभंगाच्या जोडीला या पादऱ्या पेंद्याच्या ( म्हणजे पु ल च्या ) बुळकांड्याही वाचाव्या/पाहाव्या / एकाव्या लागतात ज्या तुकारामांच्या व्यक्तित्वा समोर अतिशय बालिश /बाष्कळ / आणि वडाच्या झाडावर उगवलेल्या बाडगुंळा सारख्या वाटतात .

संत तुकारामांच्या पत्नी एक कजाग / खाष्ठ / भांडखोर / आणि जवळ पास मानसिक संतुलन ढळलेली आडणी आणि आडमुठी बाई होती तिच्या सांज सकाळच्या कटकटीना वैतागूनच तुकोबा देव धर्माच्या मार्गी लागले असे तद्दन खोटे , तुकारामांच्या पत्नीची बदनामी करणारे आणि तुकारामाच्या संतत्व भूमिकेला खुजे पणा आणनारे प्रसंग या नाटकात आहेत. या शिवाय तुकाराम महाराजांच्या सोबतीला जे चार -पाच भक्त वारकरी -टाळकरी पात्र दाखवले आहेत त्यांची अवस्था तर आणखी बिकट आहे. कुणाला घरातून हाकलून दिले आहे. कुणी सगळी संपत्ती शान शोकात आणि तमाशात उडवल्या मुळे भणंग झाला आहे. तर कुणी लष्करात शिपाई होता पण "लष्कराच्या भाकर्या भाजण्या पेक्षा इथे टाळ वाजवणे अधिक फायद्याचे " असे तो म्हणतो.कारण काय तर " इथे पोटोबा ही भरतो आणि विठोबाही घडतो " प्रत्यक्ष तुकाराम महाराजांच्या शिष्याच्या तोंडी ही असी विचारसरणी दाखवण्या मागची विकृती एखाद्या " देशपांड्याच्याच "सडक्या जातीद्वेशी डोक्यात वळवळू शकते. या नाटकात नको त्या ठिकाणी विनोदी मखलाशीचे
मेकुड काढून ते चार चौघात बोटावर खेळवत तोंडात टाकण्याचा घाणेरडे पणा पु ल ने अनेक प्रसंगात केला आहे . नको त्या ठिकाणी उंदरा सारखी शब्दांची उलटसुलट खुड बुड ( कोट्या) करून केवळ रसभंगच नव्हे प्रसंगाचे गांभीर्य जाऊन तुकारामाचा अपमान झाला आहे. तुकोबांचे शिष्य म्हणजे तर पु ल ळा नाटकातील विनोदी पात्रांना वाव वाटले की काय कुणास ठावूक ? ते अगदी गाथा पाण्यात बुडवतानाही "पुलकित विनोद करतात " मंबाजीचा रुबाब खलनायक मंबाजी ( जो ब्राम्हण आहे ) तो मात्र रुबाबदार आणि प्रभावी व तिखट चमकदार संवाद बोलताना दाखवला आहे. मंबाजी आणि तुकोबा जेव्हा एकमेका समोर येतात आणि " तुक्या तू लोकांना वेदांचा चुकीचा अर्थ सांगतो ; तुझी ती थोतांडी बाडे डोहात बुडवली पाहिजेत " असे म्हणतो. तेंव्हा तुकोबा उत्तरादाखल एक अवाक्षरही बोलत नाहीत . निमूट पणे गाथा घेवून इंद्रायणीच्या डोहाकडे चालू लागतात असा पराभूत प्रसंग दाखवला आहे. वास्तवात तुकारामांनी या वेळी आपली बाजू समर्थ पणे मांडून नंतर स्वतः गाथेचे विसर्जन केले होते. .....!!!