My Followers

Thursday 16 March 2023

शौर्याचा मूर्तीमंत पुतळा...

शौर्याचा मूर्तीमंत पुतळा...

नेफामधील सेला उतारावर लढणाऱ्या मिडियम मशिनगन तुकडीचे नेतृत्व हवालदार कांबळे यांच्याकडे होते. 

१८ नोव्हेंबर १९६२ रोजी चिनी सैन्याने, या विभागावर जोरदार हल्ला केला, शत्रूच्या मशिनगन्समधून आगीचा वर्षाव होत असताही हवालदार कांबळे या खंदकातून त्या खंदकाकडे धांव घेऊन जवानांना मार्गदर्शन करीत होते. 

प्रत्यक्ष समोर ठाकलेला शत्रू, मशिनगन्समधून होणारा गोळ्यांचा वर्षाव त्यांच्या खिजगणतीतच नव्हता. 

परंतु अखेर त्या घातकी शत्रूच्या गोळ्या, त्या शूर वीराच्या दोन्ही पायांत घुसल्या! परंतु हा वीर कांही लेचापेचा नव्हता, पाय कामातून गेले तरीही हवालदार कांबळे धडपडत धडपडत व असह्य यातना आनंदाने सोशीत मिडियम मशिनगन्सच्या खंदकात परतले. 

नंतर कंपनीला माघार घेण्यास सांगण्यात आले, त्यावेळी त्यांनी आपल्या कंपनीतील जवानांना माघार घेता यावी म्हणून शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव चालूच ठेवला. जवान सुखरुप माघारी वळले...

परंतु असे करीत असता भारतमातेचा हा सुपुत्र मात्र धारातीर्थी पडला...

त्यांना मरणोपरांत वीर चक्राने सन्मानीत करण्यात आले...!

- ॲड.राज जाधव, पुणे...!

(संदर्भ - अस्पृश्यांचा लष्करी पेशा, पृष्ठ क्र.१०२)

ROLL OF HONOUR...!

जम्मू आणि काश्मिरच्या समरभूमीवर मराठे आणि महार जवान शौर्याने, उत्साहाने आणि चिकाटीने लढले म्हणून त्यांना शत्रूंना खडे चारता आले, आणि दिगंत किर्ती मिळविता आली. मराठे जवान 'हर हर महादेव' व 'छत्रपति शिवाजी महाराज की जय अशा विजयी घोषणा देत शत्रूवर हल्ले करीत. 

महार जवानही या घोषणा करीत आणि शिवाय त्यांना लढण्यास स्फूर्ती देणारी आणखी एक घोषणा 'जय भीम' ही होय! 

जम्मू व काश्मिर या समरांगणांत जे महार जवान कामास आले त्यांची यादी खालील प्रमाणे:-

( ROLL OF HONOUR THOSE WHO DIED IN J. & K. OPERATION )

Hav. RAWOO KAMBALE 

Hav. DADU PARANJAPE

Hav. PANDURANGA RASAL

Hav. SEWAK JADHAV

Naik BARKYA KAMBALE

PILINk. MARUTI TAMBE

Sep. YESHWANT KAMBLE

Sep.MARUTI SARJE

Sep.GURUBALA SABLE

Sep.TUKARAM KAMBALE

Sep.SONYA POWER

Sep.SURAYAJI HATE

Sep.JANU TAMBE

Sep.GANGARAM MOHITE

Sep.NANA SONAWANE

Sep.BABU KHANDIZOD

Sep.KONDIBA AKHADE

Swpr. BABU LACHMAN

- ॲड.राज जाधव, पुणे...!

(The Mahar MG Regiment, Page - 86 व अस्पृश्यांचा लष्करी पेशा, पृष्ठ - ९७)

भीमा कोरेगाव लढाई १८१८...!

अलेक्झांडर रॉबर्टसन (Minister of Kilmallie, Scotland) हे त्यांच्या १९३८ ला प्रसिद्ध झालेल्या "दि महार फोक" या पुस्तकाच्या "दि मिलिटरी रेकॉर्डस ऑफ दि महार" या चॅप्टर मध्ये पृष्ठ क्र.६२ वर भीमा कोरेगाव लढाई संदर्भात लिहितात... 

".... But in particular the Mahar folk cherish the memory of the fight at Koregaon on the 1st January, 1818, when the flower of Maratha chivalry, in retreat it is true, but by no means broken, swooped in many thousands upon a force of 600 rank and file, which was on the march from Sirur to Kirkee. 

There were just about two dozen European gunners and a few European officers in that small body of 600 outcastes which entrenched itself in the village of Koregaon when the Peshwa's army fell upon it. 

For twelve weary hours a hand to hand conflict was main- tained until many were slain and wounded on both sides. The victory lay with the small British force. 

The heroism of that day is commemorated on the monument which stands on the bank of the sacred Bhima where the Poona-Ahmednagar Road crosses the river. 

The Mahar names on the monument may be recognised by the termination - nak; and they are not a few..."

हजारो वर्षापासून महारांच्या शौर्याचा इतिहास दडवून ठेवला आहे, हा स्तंभ उभा नसता तर १८१८ चा इतिहास देखील त्यांच्या रक्तासोबतच भीमा नदीत वाहून गेला असता...!

- ॲड.राज जाधव, पुणे...!

महार सैनिकांचा गौरवशाली इतिहास...

महार सैनिकांचा गौरवशाली इतिहास... 

इ. स. १८२६ मध्ये काठियावाड, १८४६ मध्ये मुलतान आणि इ. स. १८८० मध्ये कंदाहार येथे ज्या लढाया इंग्रजानी केल्या त्यांत महार लढवय्यांनी आपल्या शौर्याचा झेंडा उभारला. 

इ. स. १८८० मध्ये दुसरे अफगाण युद्ध झाले, त्यांत अफगाणिस्थानांत असलेला इंग्रजांच्या डुब्रो' येथील तळावर शत्रूनी हल्ला केला, तेव्हां त्या तळाचे संरक्षण करताना १९ वी बाँबे इन्फट्री (पायदळ) ने शौर्याची कमाल केली. १९ व्या मुंबई पायदळांत बहुसंख्य लढवय्ये महार होते. 

या लढाईत १६ एप्रिल १८८० रोजी विशेष रंग आला. तो असा की एका मा-याच्या ठिकाणावर शत्रूनी हल्ला केला, तेव्हां तेथील इंग्रजसैनिकांनी माघार घेतली. पण त्यातील तिघांनी मात्र पाय रोवून, त्या ठिकाणी शत्रुला तोंड दिले. शत्रुंची संख्या ३०० होती. त्या संख्येपुढे या तिघांचा निभाव लागणार नाही म्हणून सहकाऱ्यांनी त्यांना माघार घेण्यास सांगितले. पण ते तिघे शूर वीर जागेवरून हालले नाहीत. त्या तिघांनी तीन तास लढत दिली व तीनशे शत्रूपैकी बऱ्याच जणांना यमसदनास पाठविले.

जेव्हां त्यांच्या जवळची काडतुसे संपली तेव्हां ते शत्रूच्या घोळक्यात शिरून बंदुकीचा उपयोग लाठी सारखा करून शत्रूला झोडपू लागले. लढता लढता ते धारातीर्थ पडले...

ते तीन महावीर म्हणजे मेजर सिडने जेम्स वॉडबी, प्रायव्हेट इलाही बक्ष आणि प्रायव्हेट सौननाक ताननाक... (महार, शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते तेव्हांपासून त्यांच्या नावापुढे नाक हे उपपद लावण्यात येत असे. तीच प्रथा पुढील काळांत इंग्रजी अमदानीतही चालू राहिली.) या शूर वीरांचे स्मृतिचिन्ह म्हणून मुंबईतिल युरोपियन जिमखाना जवळच्या रस्त्याला 'बॉडबी रोड' हे नाव देण्यांत आले, आणि आलेक्झाड्रा गर्लस हायस्कूलच्या भिंतीत एक शिलालेख ठेवण्यांत आला. तो शिलालेख असा:-

"This Road is named after Major Sidney James Waudby, who with Elahi Bux and Private Sonnak Tannak (nak was a characteristic suffix to Mahar names that dates from their service in Shivaji's armies) all of the 19th Bombay Infantry, fell on the 16th April 1880, in fence of Dubro, post in Afganistan which, when warned that an attack in force was imminent, they refused to abandon and most gallantly held for three hours against three hundred of the enemy, many of whom were slain. Eventually when all their ammunition was expended they dashed into the amidst of their foes and died fighting. The odds are even greater than at Koregaon and the heroes were of the same castes, a Europen, a Muslim and the Mahar, who had made up the Bombay Regiments from the start".

- ॲड.राज जाधव, पुणे...!

(संदर्भ - Dr. Babasaheb Ambedkar writings and speeches, Val 17, Part III, Page - 36, The Mahar MG Regiment, Page - 8-9, अस्पृश्यांचा लष्करी पेशा )