My Followers

Thursday 16 March 2023

हवालदार राऊ कांबळे...!

शिरच्छेद झाला तरीही हल्ला चालूच ठेवणारा विर पराक्रमी... 

१९४७ मध्ये प्रथम महार बटालियन जम्मू काश्मीर मध्ये तैनात असताना...

हवालदार राऊ कांबळे आणि नाईक बारक्या कांबळे हे आपली तुकडी घेऊन झांगर या रणक्षेत्रावर ६००० पाकिस्तानी शत्रू सैन्याला सामोरे गेले. 

त्या ६००० पाकिस्तानी शत्रू सैनिकांना आपल्या तुकडीतील ५० सैनिकानिशी तोंड देत राहिले व त्यांचे इतर सहकारी शत्रूच्या तावडीत सापडू म्हणून शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव करीत राहिले.

या कांबळे यांनी शत्रूला जागचे जागी थोपवून धरले आणि आपल्या सहकारी तुकड्यांना पाकिस्तानी शत्रूच्या जबड्यातून बाहेर पडण्यास भरपूर वाव दिला, त्यावेळी तुकडीतील सर्व सैनिक कामास आलेले होते. 

आता या दोघा वीरांवर शत्रूने हल्ला चढविला व ते दोघे ज्या इमारतीच्या आश्रयाने गोळ्यांचा वर्षाव करीत होते त्या इमारतीलाच आग लावून दिली. आणि त्या दोघांना पकडून त्यांचा शिरच्छेद केला... 

शिरच्छेद झाला तरीही चार - पाच सेकंद राऊ कांबळे यांच्या मशीनगमधून गोळीबार चालूच होता...

या दोन वीरांची नांवे बटालियनच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिली गेली. डिसेंबर १९४७ च्या काळात कंपनीने जो रणसंग्राम काश्मिरच्या रणभूमीवर केला त्यांत १० सैनिक कामास आले, ६ जखमी झाले आणि १ बेपत्ता झाला.

झांगर येथील संग्रामात जे महार बटालियनचे नुकसान झाले होते, त्याचा वचपा दुसऱ्या कंपनीने नौशेरच्या ६ फेब्रुवारी १९४८ ला झालेल्या रणसंग्रमात काढला. 

या लढाईतील तुकडीचे नेतृत्व नाईक कृष्णा सोनवणे आणि पुंडलिकमहार यांचे होते. या दोघानी शौर्याची कमाल केली. त्या दोघांनी सुमारे १००० शत्रूंना एका दमात गारद केले. जम्मू व काश्मिर यांच्या रणक्षेत्रात जेवढी शत्रूची संख्या मृत म्हणून गणली गेली; त्यात नौशेरच्या रणक्षेत्रातील हा एक हजार शत्रूंना ठार केल्याचा आकडा सर्वांत मोठा होय.

जम्मू आणि काश्मिर येथील समरांगणात पहिल्या महार बटालियन मधील ज्या महार तरुणांनी आपले देह धारतीर्थी ठेवले त्यांच्याबद्दल अनेक जणांनी प्रशंसोद्धार काढलेले आहेत. 

- ॲड.राज जाधव, पुणे...!

(संदर्भ - The Mahar MG Regiment, Page 40-41, अस्पृश्यांचा लष्करी पेशा, पृष्ठ क्र.७३-७४)

(सदर लेखावर काम चालू आहे, संकलीत करण्याच्या उद्देशाने publish केला आहे)

No comments:

Post a Comment