My Followers

Thursday 16 March 2023

महार सैनिकांचा गौरवशाली इतिहास...

महार सैनिकांचा गौरवशाली इतिहास... 

इ. स. १८२६ मध्ये काठियावाड, १८४६ मध्ये मुलतान आणि इ. स. १८८० मध्ये कंदाहार येथे ज्या लढाया इंग्रजानी केल्या त्यांत महार लढवय्यांनी आपल्या शौर्याचा झेंडा उभारला. 

इ. स. १८८० मध्ये दुसरे अफगाण युद्ध झाले, त्यांत अफगाणिस्थानांत असलेला इंग्रजांच्या डुब्रो' येथील तळावर शत्रूनी हल्ला केला, तेव्हां त्या तळाचे संरक्षण करताना १९ वी बाँबे इन्फट्री (पायदळ) ने शौर्याची कमाल केली. १९ व्या मुंबई पायदळांत बहुसंख्य लढवय्ये महार होते. 

या लढाईत १६ एप्रिल १८८० रोजी विशेष रंग आला. तो असा की एका मा-याच्या ठिकाणावर शत्रूनी हल्ला केला, तेव्हां तेथील इंग्रजसैनिकांनी माघार घेतली. पण त्यातील तिघांनी मात्र पाय रोवून, त्या ठिकाणी शत्रुला तोंड दिले. शत्रुंची संख्या ३०० होती. त्या संख्येपुढे या तिघांचा निभाव लागणार नाही म्हणून सहकाऱ्यांनी त्यांना माघार घेण्यास सांगितले. पण ते तिघे शूर वीर जागेवरून हालले नाहीत. त्या तिघांनी तीन तास लढत दिली व तीनशे शत्रूपैकी बऱ्याच जणांना यमसदनास पाठविले.

जेव्हां त्यांच्या जवळची काडतुसे संपली तेव्हां ते शत्रूच्या घोळक्यात शिरून बंदुकीचा उपयोग लाठी सारखा करून शत्रूला झोडपू लागले. लढता लढता ते धारातीर्थ पडले...

ते तीन महावीर म्हणजे मेजर सिडने जेम्स वॉडबी, प्रायव्हेट इलाही बक्ष आणि प्रायव्हेट सौननाक ताननाक... (महार, शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते तेव्हांपासून त्यांच्या नावापुढे नाक हे उपपद लावण्यात येत असे. तीच प्रथा पुढील काळांत इंग्रजी अमदानीतही चालू राहिली.) या शूर वीरांचे स्मृतिचिन्ह म्हणून मुंबईतिल युरोपियन जिमखाना जवळच्या रस्त्याला 'बॉडबी रोड' हे नाव देण्यांत आले, आणि आलेक्झाड्रा गर्लस हायस्कूलच्या भिंतीत एक शिलालेख ठेवण्यांत आला. तो शिलालेख असा:-

"This Road is named after Major Sidney James Waudby, who with Elahi Bux and Private Sonnak Tannak (nak was a characteristic suffix to Mahar names that dates from their service in Shivaji's armies) all of the 19th Bombay Infantry, fell on the 16th April 1880, in fence of Dubro, post in Afganistan which, when warned that an attack in force was imminent, they refused to abandon and most gallantly held for three hours against three hundred of the enemy, many of whom were slain. Eventually when all their ammunition was expended they dashed into the amidst of their foes and died fighting. The odds are even greater than at Koregaon and the heroes were of the same castes, a Europen, a Muslim and the Mahar, who had made up the Bombay Regiments from the start".

- ॲड.राज जाधव, पुणे...!

(संदर्भ - Dr. Babasaheb Ambedkar writings and speeches, Val 17, Part III, Page - 36, The Mahar MG Regiment, Page - 8-9, अस्पृश्यांचा लष्करी पेशा )

No comments:

Post a Comment