'असहकार्य' की 'बहीष्कार'...?

तसेच... त्याला अनुसरुन कोरेगाव - भिमा येथील ग्रामपंचायतीने 'बंद' चा ठराव पास करुन घेतल्याचे प्रसिध्दी पञकावरुन दिसुन येतेय...
शेकडो मैलांवरुन आलेल्या गोर गरीब जनतेला पाणी ही न मिळु देणे, एवढ्या नीच मानसिकतेची नोंद जगात नाही...

नाशीकवरुन आलेल्या एका महीलेने घरातचं दुकान असलेल्या दुकानदाराला पाण्याच्या बाटलीला शंभर रुपये देऊ केले तरीही त्या महिलेला पाणी न देता, जयभिमवाल्यांना काहीही द्यायचे नाही, असा आदेश असल्याचे सांगण्यात आले, कोणी दिले हे आदेश ?
ग्रामस्थांचा हा असहकार मानवतेला काळीमा फासणारा आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, दंगलीची शक्यता होती, मग दंगलीची शक्यता तुम्हांस दोन दिवसापुर्वी कशी आली व तुम्ही दोन दिवस अगोदरचं 'बंद' चा ठराव पास करुन घेतलात. यापुर्वी अभिवादन करण्यास येणारे हेच लोक होते, तेव्हा का दंगलीची शक्यता भासली नाही ?
कारण, दंगल होणार हे पुर्व नियोजित होते, ग्रामस्थांना हे दोन दिवस अगोदरचं माहीत होते ?

त्यामुळे वढु बु., कोरेगाव - भीमा, शिक्रापुर येथील ग्रामस्थ देखील या 'criminal conspiracy' चा एक भाग म्हणावे लागतील. त्यामुळे त्यांचेवर देखील गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे.
मुळ मुद्दा आहे 'असहकाराचा', असहकार, बंद कोणाविरुद्ध तर एका विशिष्ट जमावाविरुद्ध... अभिवादनास येणारया लोकांविरुद्ध....
ज्या लोकांवर हल्ले झाले, गाड्या जाळल्या त्या लोकांना तेथुन बाहेर पडण्यासाठी कोणतेही वाहन नव्हते, हाॅस्पीटल्स बंद होते, मदत सोडा साधे पिण्यासाठी पाणी नाही...
त्यामळे एका विशाष्ट समाजास सहकार्य न करणे, हा एक प्रकारे 'सामाजिक बहिष्कार'चं आहे...
त्यामुळे कोरेगाव - भिमा ग्रामपंचायत, शिक्रापुर, वढु बु. व इतर ग्रामस्थ यांचेवर सामाजिक बहिष्कार अधिनियमा अंतर्गत गुन्हा नोंदवावा.
जेणे करुन पुढील वर्षी असा 'माणुसघाणेपणा' करताना याचा पुन्हा पुन्हा विचार केला जाईल.
- अॅड. राज जाधव, पुणे...!
No comments:
Post a Comment