My Followers

Monday 12 September 2016

"अॅट्रोसीटी" समज गैरसमज...?

"अॅट्रोसीटी" समज गैरसमज...?


संविधानाने सर्व भारतीयांस सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय व समान संधी प्रदान करुन सर्वांना समान हक्क व अधिकार दिले, त्यामुळे अनुसूचित जाती, जमातीतील लोक शिकु लागले, जागृत होऊ लागले,
परिणामी ते आपल्या मुलभुत हक्काविषयी आपली मते मांडु लागले त्यासाठी झगडु लागले, परंतु त्या मुळे संरमजंमशाहीवृत्तीला धक्का पोहचु लागला,
उदा. अनुसूचित जातीचे लोक अस्पृश्यतेसारख्या प्रथेस विरोध करतात, आपल्याला समानधिकाराची मागणी करतात, मुलभुत हक्कासाठी वेठबिगारीची कामे करण्यास नकार देतात, अशावेळी समाजातील प्रभावी, बलशाली वर्गाचा व सरंमजामीवृत्तीचा प्रखर क्रोध ओढवुन घेतात.
यातुनच अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीच्या लोकांवर अन्याय व अत्याचार केले जातात.
वेळेनुसार अनुसूचित जाती जमाती मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपड करु लागल्या, तसतसे त्यांचेवर अत्याचार वाढु लागले, अस्तित्वात असणारा नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 व भारतीय दंड संहिता, 1860 यातील तरतुदी जातीय अत्याचारास अळा घालण्यास, प्रतीबंध करण्यास कमी पडु लागल्या, परिणामी जातीय आणी अमानवीय वृत्ती ठेचुन काढण्यासाठी संसदेने "अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अनिधियम 1989" हा प्रभावी कायदा पारित केला व त्याचप्रमाणे "अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक नियम 1995" अमलात आणले...
आज कायद्याला सत्तावीस वर्षे होऊन गेली तरीही कायद्याची योग्य अमंलबजावणी न झाल्यामुळे आजही काही ठिकाणी अत्याचार घडतंच आहेत, राष्ट्रीय अपराध ब्युरोने जाहीर केलेली अत्याचाराची आकडेवारी विचार करण्यासारखी व भयावह आहे,
याची भारत सरकाने गांभीर्याने दखल घेऊन, कायदा आणखी कठोर व्हावा म्हणून हल्लीच "अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अनिधियम, दुरुस्ती 2015" व "अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक, दुरुस्ती नियम 2016" आमलात आणले आहेत, व त्यांचे अंमलबजावणीस सुरुवात देखील केलेली आहे.
आता गंमत पहा... सरकार म्हणते 27 वर्षात योग्य अमंलबजावणी न झाल्यामुळे अत्याचारात वाढ झाली, त्यामुळे यावर विचारविनिमय करुन, अधिनियमात (Act) मागील वर्षी 2015 व यावर्षी नियमात (Rules) 2016 साली दुरुस्ती केली आहे...
आणि इथे काही लोक संधीसाधु नेत्यांच्या भावनिक आव्हानाला बळी पडुन, कायद्या रद्द करण्याची मागणी करत आहे, त्यामुळे या विषयाला गंभीरीत्या घेऊन, यावर सर्वांनी आपली सद्सदविवेकबुध्दी वापरुन विचार केला तर आपआपसांत तेढ निर्माण होणार नाही.

- अॅड.राज जाधव, पुणे...!

No comments:

Post a Comment