My Followers

Thursday 22 November 2012

26 नोव्हेंबर....संविधान दिन...!

                 26 नोव्हेंबर....संविधान दिन.....!

भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे "भारतीय संविधान" 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली, या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधानासंदर्भात जन-जागृती, माहिती व्हावी यासाठी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असे, मात्र ते सार्वत्रिक पातळीवर होत नाहीत. याबाबत महाराष्‍ट्र शासनाने यापुर्वी जनतेला 26 नोव्हेंबरला 'भारतीय संविधान द‍िन' साजरा करण्याचे ही आवाहन केले होते. मात्र यासंदर्भात राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये आदी आजही अनभिज्ञ दिसत आहे. शासनाने भारतीय संविधानची माहिती जनतेला करून देण्यासाठी 26 नोव्हेंबरला पोस्टर प्रदर्शन, बॅनर्स, निंबध स्पर्धा घेण्याच्या सुचना दिल्या होत्या मात्र त्या पाळल्या जात नसल्याचे चित्र समोर दिसत आहे. 


चार वर्षापूर्वी 26/11 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तो दिवस होता 26 नोव्हेंबर, 'भारतीय संविधानदिन'. मात्र तेव्हापासून संविधान विरोधकांना आणि मनुवाद्याना संविधान दिवसाला विरोध करण्यासाठी एक चांगले कारण भेटले आहे. म्हणून हे नमुने काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांचा हा प्रत्यन लोकशाही मानणार्यांनी आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी हाणून पाडायचा आहे.    


देशावर येणार्‍या संकटप्रसंगी सारे भारतीय, आपले जातीभेत, वंश भेद, धर्म बाजूला ठेवून सारे एकत्र येतात. ही ताकद आपल्याला भारतीय संविधानाचीच आहे. या संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे. या दिनाप्रमाणेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे दिवस सरकारच्या कालदर्शिकेतून नाहिसे होणार की काय अशी भिती आता वाटू लागली आहे.

तरी सर्वाना विनंती आहे आज पासूनाच आपण संविधान दिन निमित्त माहितीपूर्ण आणि प्रबोधनपर पोस्ट टाकाव्यात, आणि आप आपल्या स्थानिक पातळ्यावर २६ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत........!     

अँड. राज जाधव...!!! 

3 comments:

  1. अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण लेखं राज सर....

    देशावर येणार्‍या संकटप्रसंगी सारे भारतीय, आपले जातीभेत, वंश भेद, धर्म बाजूला ठेवून सारे एकत्र येतात. ही ताकद आपल्याला भारतीय संविधानाचीच आहे. या संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे.

    सविधान दिन राष्ट्रिय दिन म्हणून साजरा करने प्रत्येक भारतियाचे आद्य कर्तव्य आहे.

    जय भारत !!!!!

    ReplyDelete
  2. धन्यवाद निलेश..... "संविधान दिवस" मोठ्या प्रमाणात साजरा करून आपण आपल्या संविधान आणि त्याच्या संविधानाच्या शिल्पकाराला खरे अभिवादन केले पाहिजे...!

    ReplyDelete