My Followers

Thursday 22 November 2012

क्रूरकर्मा कसाब का हिसाब.....!

क्रूरकर्मा कसाब का हिसाब.....! 
                        
अखेर..... क्रूरकर्मा अजमल कसाब याला आज पहाटे ७.३० वाजता पुण्यातील येरवडा जेल मध्ये "ऑपेरेशन  एक्स" नुसार फासावर लटकविण्यात आले असून येरवडा जेल मधेच त्याला गाडून टाकण्यात आले आहेशिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाचा फडशा पाडून, त्याची समाधी किल्ल्याच्या पायथ्याशी बांधली, ती एक स्वराज्यावर चालून येणाऱ्यानां सूचना होती, "जर स्वराज्यावर चालून याल तर तुमचा मुडदा देखील इथेच असा गाडला जाईल.".... कसाबला इथे गाडून हेच सांगावेसे वाटेल जो जो पाकिस्तानी या भारत भूमीवर हात टाकण्याचा प्रयत्न करेल त्याला इथेच लटकवून, इथेच गाडू....! 

२६/११ मध्ये १६६ निरपराध नागरिकांचा बळी घेणारया १० पैकी ९ आतंकवाद्यांना त्याच वेळेस कंठस्थान देण्यात आले होते, पैकी १ आतंकवाद्याला जिवंत पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले होते, कसाब ला सर्व जगासमोर दोषी ठरविण्यासाठी त्याची संपूर्ण कायदेशीर रित्या ट्रायल घेण्यात आली आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला दोषी ठरविण्यात आले, आणि त्यानुसारच त्याला आज फाशी देण्यात आली, राष्ट्रपती यांनी इतर अर्जांच्या अगोदर कसाबचा दया याचिकेचा अर्ज फेटाळण्यात आला होता, संपूर्ण कायदेशीर बाजू पूर्ण करून त्या क्रूरकर्म्याला फासावर लाटकीविण्यात आले. संपूर्ण घटनाक्रमावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले कि, भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधान हे जगात श्रेष्ठ आहे....! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देशाला समर्पित करताना म्हटले होते कि, संविधानची योग्य अंमलबजावणी करणे हे, त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यावर देखील अवलंबून आहे, जर या संविधानाचा योग्य वापर केला नाही तर, तो दोष संविधानावर नसून त्याच्या वापरकर्त्यावर असेल, त्याची अंमलबजावणी चांगली केली तर संविधान चांगले आणि त्याची अंमलबजावणी वाईटरीतीने केली तर संविधान वाईट मानले जाईल."    

कसाबने २६/११ ला सायंकाळी  धुमाकूळ घालून देशाच्या सुरक्षिततेला एक प्रकारचे आव्हान दिले होते. कसाब हा २६/११/२००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी आहे. मुळचा पाकिस्तानातील फरीदकोट शहरातील रहिवासी असून गेल्या काही वर्षापासून तो अतिरेकी कारवायांमध्ये सामील झाला होता. २६/११ हल्ल्यातील पोलिसांच्या हाती आलेला एकमेव जिवंत अतिरेकी. कसाबचे ह्या हल्ल्यातील बाकीचे सर्व अतिरेकी मारले गेले. कसाब आणि त्याच्याबरोबरील अतिरेक्यांनी मिळून केलेल्या दहशतवादी हल्ल्यात २०० निरपराध लोकांची हत्त्या केली. ज्यात ३४ विदेशी नागरिकांचा ही समावेश होता. कसाबच्या विरोधात एकूण ८६ आरोप सिद्ध झाले आहेत. या आरोपांमध्ये देशद्रोही कृत्य करणे, विशेष टाडा न्यायालयाने त्याला ५ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा ठोठावली होती आणि ४ अन्य गुन्ह्यांमध्ये आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली होती. 

क्रूरकर्मा कसाबविरुद्ध गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले होते. देशाविरुद्ध युद्ध पुकारुन देशाच्या सुरक्षिततेला आव्हान देणे, हत्येचे ‘प्लॅनिंग’ करणे, हत्या करण्यासाठी इतर अतिरेक्यांना मदत करणे. भारतीय दंडविधानाच्या कलम ३०२ अन्वये आणि दहशतवाद प्रतिबंधक कायद्यानुसार कसाबची फाशी सुप्रीम कोर्टाने निश्चित केली होती. ‘२६/११ ला सायंकाळी कसाबने धुमाकूळ घालून देशाच्या सुरक्षिततेला एक प्रकारचे आव्हान दिले होते. कसाब एखाद्या रोबोटसारखा काम करत नव्हता. त्याच्या विरोधात ठोस पुरावे आहेत. त्यावरुन त्याला शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे’, असे मत न्यायाधीश आफताब आलम आणि सी. के. प्रसाद यांच्या खंडपीठाने कसाबच्या फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.परंतुसबाउद्दीन अहमद आणि फहीम अन्सारी  यांच्या विरोधात कोणताही सबळ असा पुरावा नसल्याकारणाने सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवले व राज्य सरकारने जी याचिका दाखल केली होती, ती फेटाळून लावली होती.

क्रूरकर्मा कसाबच्या वकिलाने त्याची बाजू मांडताना वक्तव्य केले होते की, ‘कसाब वयाने मोठा नव्हता. त्याचे ‘ब्रेन वॉश’ करुन त्याला ‘जिहाद’ साठी प्रवृत्त करण्यात आले. तो फक्त एका रोबोटसारखा काम करत होता’. पण हे सगळे मुद्दे खंडपीठाने खोटे ठरवले. मात्र, सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा पर्याय कसाबकडे आहे. जर ही याचिका सुद्धा फेटाळण्यात आली तर तो क्यूरिटिव्ह पिटीशनचा पर्याय वापरु शकतो. तो राष्ट्रपतींकडे दयेचा अर्जही दाखल करु शकतो. व त्यानुसारच अजमल कसाब याने राष्ट्रपती यांचे कडे दयेचा अर्ज करून फाशीची शिक्षा कमी करावी म्हणून अपील केले होते, परंतु महामहीम राष्ट्रपती मोहोदय श्री. प्रणब मुखर्जी यांनी ५ नोव्हेंबर २०१२ रोजी कसाबची दया याचिका फेटाळून लावली आणि कसाब च्या फाशीवर शिक्का मोर्तब केले. 

क्रूरकर्मा अजमल कसाबला फासावर लटकवणार हे निश्चित झालं होतं. पण ही फाशी कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुप्त पद्धतीनं देण्यात आली. साहजिकच, या गुप्ततेचा भंग होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांना कमालीची काळजी घ्यावी लागली. ही गुप्तता एवढी प्रचंड होती की, खुद्द येरवडा तुरुंगातील ज्या जल्लादानं कसाबला फासावर चढवलं त्यालादेखील प्रत्यक्ष क्षणापर्यंत याची कल्पना नव्हती की तो नक्की कुणाला फाशी देणार आहे. 

२००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबला सापडल्यापासूनच आर्थर रोडमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण, त्याच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी मात्र पुण्यातील येरवडा तुरुंगात होणार होती. त्यासाठी कसाबला पुण्याला हलवावं लागणार होतं. यासाठी सुरक्षा यंत्रणांनी १८ नोव्हेंबर संपण्याची आणि १९ नोव्हेंबर उजाडण्याची वेळ निवडली. 
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रान्च, कमांडोज् ऑफ क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) तसंच आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांवर कसाबला पुण्याला पोहचवण्याची जबाबदारी होती. ही संपूर्ण टीम २००८ पासूनच कसाबच्या देखरेखीसाठी तैनात करण्यात आली होती. याच टीमबरोबर १९ नोव्हेंबरला पहाटेच कसाबला येरवडा तुरुंगात दाखल करण्यात आलं. येरवडा तुरुंगात दाखल होणाऱ्या या नव्या आरोपीची ओळख मात्र गुप्त ठेवण्यात आली होती. येरवडा तुरुंग अधिक्षकाशिवाय ही गोष्ट कुणालाच माहित नव्हती, ना जेलच्या इतर अधिकाऱ्यांना... ना डॉक्टरांना...‘जेलच्या अधिकाऱ्यांना फक्त एव्हढंच सांगण्यात आलं होती की, कुणीतरी हाय-प्रोफाईल आरोपी येरवड्यात येणार आहे. नक्की कोण आहे हे मात्र सांगण्यात आलं नव्हतं. यावेळीही आईटीबीपी अधिकाऱ्यांच्या संरक्षणात एका अंडाकृती सेलमध्ये कसाबला ठेवण्यात आलं होतं. तुरुंगाच्या जल्लादालाही आम्ही एव्हढंच सांगितलं होतं की, एका दहशतवाद्याला फाशी द्यायची आहे. प्रत्यक्ष फाशी देण्याच्या काही मिनिटे अगोदर त्याला हे सांगितलं गेलं की तो कसाबच आहे’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

फाशी देण्याच्या अगोदर अंतिम इच्छेबद्दल कसाबला विचारलं तेव्हा त्यानं नकारात्मक उत्तर देऊन आपली काहीही अंतिम इच्छा नसल्याचं म्हटलं. 
मुंबईत हल्ला करून १६६ निरपराध जीवांचे बळी घेणार क्रुरकर्मा कसाब समोर मृत्यूला पाहून भेदरला होता. फाशीच्या वेळी तो अस्वस्थ आणि गप्प होता...थोड्याच वेळात त्याला फासावर चढवण्यात आलं आणि तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी कसाब मृत झाल्याचं घोषित केलं... अखेर एका क्रूरकर्म्याचा शेवट देखील एका कायदेशीर प्रक्रीयेव्दारे कोणताही शोर्ट कार्ट न मारता २६/११ मधील निष्पाप बळी आणि शाहिदा नां अखेर न्याय मिळाला, हे फक्त भारतातच शक्य आहे.....!

अँड. राज जाधव...!!! 

संदर्भ - 
१. जलदगती न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे, 
२. विविध वर्तमानपत्रे, लेख  

3 comments:

  1. 26 नवंबर 2008 को हुए मुंबई हमले से लेकर अजमल आमिर कसाब को फांसी दिए जाने तक का घटनाक्रम इस प्रकार है:

    26 नवंबर 2008 : कसाब और नौ आतंकवादियों ने मुंबई में विभिन्न स्थानों पर हमला किया.
    27 नवंबर 2008 : कसाब को तड़के एक बज कर तीस मिनट पर पकड़ा गया और गिरफ्तार कर नायर अस्पताल में भर्ती कराया गया.
    29 नवंबर 2008 : आतंकवादियों के कब्जे वाले सभी स्थानों को मुक्त कराया गया. नौ आतंकवादी मारे गए.
    30 नवंबर 2008 : कसाब ने पुलिस के समक्ष अपना अपराध स्वीकार किया.
    13 जनवरी 2009 : एमएल ताहिलियानी मुंबई हमला मामले की सुनवाई के लिए न्यायाधीश नियुक्त किए गए.
    26 जनवरी 2009 : कसाब के खिलाफ सुनवाई के लिए ऑर्थर रोड जेल का चयन.

    5 फरवरी 2009 : कसाब के डीएनए के नमूने कुबेर नौका में पाए गए सामान में मिले डीएनए से मिल गए. कुबेर नौका से ही दसों आतंकवादी पाकिस्तान के कराची से समुद्र मार्ग से मुंबई पहुंचे थे.

    20-21 फरवरी 2009 : कसाब ने मजिस्ट्रेट के सामने अपना अपराध स्वीकार किया.
    22 फरवरी 2009 : उज्ज्वल निकम सरकारी वकील नियुक्त.
    25 फरवरी 2009 : कसाब और दो अन्य के खिलाफ आरोपपत्र अदालत में दाखिल.
    1 अप्रैल 2009 : अंजलि वाघमरे कसाब की वकील नियुक्त.
    15 अप्रैल 2009 : बतौर कसाब की वकील, अंजलि वाघमरे हटाई गईं.
    16 अप्रैल 2009 : अब्बास काजमी कसाब के वकील नियुक्त.
    17 अप्रैल 2009 : कसाब का इकबालिया बयान अदालत में खोला गया. लेकिन कसाब बयान से मुकर गया.
    20 अप्रैल 2009 : अभियोजन पक्ष ने कसाब पर 312 आरोप लगाए.
    29 अप्रैल 2009 : विशेषज्ञों ने कहा, कसाब नाबालिग नहीं.
    6 मई 2009 : आरोप तय किए गए. कसाब पर 86 आरोप लगाए गए लेकिन उसने आरोपों से इंकार किया.
    8 मई 2009 : पहले प्रत्यक्षदर्शी ने गवाही दी, कसाब को पहचाना.
    23 जून 2009 : हाफिज सईद, जकी-उर-रहमान लखवी सहित 22 लोगों के खिलाफ गैर जमानती वारंट जारी.
    30 नवंबर 2009 : बतौर कसाब के वकील, अब्बास काजमी हटाए गए.
    1 दिसंबर 2009 : केपी पवार काजमी की जगह कसाब के वकील नियुक्त.
    16 दिसंबर 2009 : अभियोजन पक्ष ने मुंबई हमला मामले में अपनी गवाही पूरी की.
    18 दिसंबर 2009 : कसाब ने सभी आरोपों का खंडन किया.
    31 मार्च 2010 : मामले में जिरह समाप्त. विशेष न्यायाधीश एम एल ताहिलियानी ने फैसला तीन मई 2010 तक के लिए सुरक्षित रखा.
    3 मई 2010 : कसाब को दोषी ठहराया गया. सबाउद्दीन अहमद और फहीम अंसारी सभी आरोपों से बरी.
    6 मई 2010 : निचली अदालत ने कसाब को मौत की सजा सुनाई.
    21 फरवरी 2011 : बंबई उच्च न्यायालय ने कसाब को मौत की सजा बरकरार रखी.
    मार्च 2011 : कसाब ने उच्चतम न्यायालय को पत्र लिख कर उच्च न्यायालय के फैसले को चुनौती दी.
    10 अक्टूबर 2011 : उच्चतम न्यायालय ने पाकिस्तानी आतंकवादी कसाब को सुनाई गई मौत की सजा की तामील पर रोक लगाई.
    10 अक्टूबर 2011 : कसाब ने उच्चतम न्यायालय में कहा कि ‘अल्लाह’ के नाम पर जघन्य अपराध को अंजाम देने के लिए उसके दिमाग में ‘रोबोट’ की
    तरह बातें भरी गईं और वह कम उम्र होने की वजह से मौत की सजा पाने का हकदार नहीं है.

    18 अक्टूबर 2011 : उच्चतम न्यायालय ने महाराष्ट्र सरकार की अपील विचारार्थ स्वीकार की, जिसमें मुंबई हमला मामले में अजमल कसाब के सह आरोपियों फहीम अंसारी और सबाउद्दीन अहमद को बरी किए जाने के फैसले को चुनौती दी गई थी.
    31 जनवरी 2012 : कसाब ने उच्चतम न्यायालय में कहा कि उसके खिलाफ मामले में स्वतंत्र एवं निष्पक्ष सुनवाई नहीं हुई.
    23 फरवरी 2012 : उच्चतम न्यायालय में, मुंबई हमले के षड़यंत्रकारियों और उनके पाकिस्तानी आकाओं के बीच हुई बातचीत के अंश सुनवाए गए और
    नरसंहार के सीसीटीवी फुटेज दिखाए गए.

    25 अप्रैल 2012 : उच्चतम न्यायालय ने ढाई माह से अधिक समय तक चली मैराथन सुनवाई के बाद अपना फैसला सुरक्षित रखा.
    29 अगस्त 2012 : उच्चतम न्यायालय ने कसाब की मौत की सजा और मामले में दो कथित भारतीय सह आरोपियों को बरी किए जाने का फैसला बरकरार रखा.
    16 अक्टूबर 2012 : केंद्रीय गृह मंत्रालय ने राष्ट्रपति से कसाब की दया याचिका खारिज करने की सिफारिश की.
    5 नवंबर 2012 : राष्ट्रपति ने कसाब की दया याचिका ठुकराई.
    8 नवंबर 2012 : महाराष्ट्र सरकार को राष्ट्रपति के फैसले की सूचना मिली.
    21 नवंबर 2012 : कसाब को पुणे स्थित यरवदा जेल में फांसी दी गई.

    ReplyDelete
  2. प्रिय अतिरेक्यांनो...

    मारुन मारुन माराल किती?
    हा सव्वाशे कोटींचा देश आहे.
    तावुन-सुलाखुन निघालो आम्ही
    एकात्मता अजुन शेष आहे.

    जिंकल्याची नशा चढेल
    हा क्षणभराचा भास आहे.
    एकशे पन्नास वर्षे लढण्याचा
    पाठीशी आमच्या इतिहास आहे.

    लपुन-छ्पुन लढता तुम्ही
    औलाद तर भित्र्यांची आहे.
    दिसली जी झलक आम्हांला,
    ती पिसाळलेल्या कुत्र्यांची आहे.

    कधी हिरवा,कधी भगवा
    ही तुमची धार्मिक ढाल असते.
    वाहिले जाते जे रक्त
    ते तर फक्त लाल असते.

    तसे तुमचे नापाक इरादेही
    कधी पूर्ण होऊ शकत नाहीत.
    तिरंग्याची शपथ आहे,
    आम्ही उगीच बकत नाहीत.

    नाक उचलून बोलतो आम्ही
    तुमच्याप्रमाणे नकटे नाहीत.
    राहिल जग पाठीशी आमच्या
    आम्ही काही एकटे नाहीत.

    आमच्या अभंगतेच्या कथा
    तुम्हांस कळून चुकल्या आहेत.
    झाडल्या गोळ्या,फोडले ‍ब्वांम्ब
    त्या आमच्यासाठी टिकल्या आहेत.

    हा गैरसमज काढून टाका,
    तुम्ही आम्हांला गुलाम करताल !
    तुम्हीच"भारत माता की जय" म्हणीत
    तिरंग्याला सलाम करताल !!

    -सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

    ReplyDelete
  3. ज्यावेळेस मालेगाव चे बॉम्बस्पोट करणारे कर्नल पुरोहित व त्याचे सर्व ब्राह्मण साथीदार व भारतात बॉम्बस्पोट करणारे सर्व ब्राह्मण यांना फासावर लटकवले जाईल तेव्हाच भारतीय लोकशाही व संविधान आमलात आली असे समजा. कारण मुस्लीम विरोधी कारवाई लवकर केली जाते,मुस्लीम चा विरोध केला म्हणजे हिंदू नावाचा जो ब्राह्मणी धर्म आहे त्याचा प्रचार वाढतो. परंतु ब्राह्मनाणे केलेले क्रूरकर्म विरोधात कधीच कारवाई केली जात नाही.

    ReplyDelete