My Followers

Saturday 22 December 2012

बाबासाहेबांनी भूमी सुपीक केलीय.........!

बाबासाहेबांनी भूमी सुपीक केलीय.........!


(नव्या पिढीला ' बौद्ध ' म्हणून राखीव जागेचा फायदा घेता येत नसे तेव्हा नोकरी लागावी म्हणून बौद्धाचं 'हिंदू-महार' कसं करावं, हे तंत्र त्यांना शिकवलं जात होतं. तुम्ही धर्मांतरित झालात , हे थांबवणं आमच्या हातात नसलं तरी तुम्हाला पुन्हा 'महार' बनवणं मात्र आमच्या हातात आहे, असं काँग्रेसनं दाखवून दिलं आणि चळवळीचा मोठा अपमान केला, पण या अपमानातून बाहेर काढण्याचं काम मात्र विश्वनाथ प्रताप सिंगांनी केलं, अशी मांडणी करताहेत भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख...) 

/photo.cms?msid=2672804भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेकरांनी मे महिन्यात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची मुंबईत स्थापना केली. नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांनी या संस्थेचं 'भारतीय बौद्ध महासभा ' असं नामकरण केलं. मे १९५६ मध्ये लंडनच्या ब्रिटिेश ब्रॉडकास्टिंग कॉपोर्रेशनने बाबासाहेबांचं एक भाषण प्रसिद्ध केले. या भाषणाचा विषय होता , ' मला बौद्ध धम्म का आवडतो ?' त्या भाषणात काही बाबी त्यांनी मांडल्या. ते म्हणतात , प्रज्ञा , करुणा आणि समता ही तत्त्वं कोणत्याही धर्मात आढळत नाहीत. तथागत म्हणतात , अंधश्ाद्धा ,चमत्कार , देव नि आत्मा समाजाचं भलं करू शकत नाहीत तर समाजाला या गोष्टी अंध:कारात ढकलून देतात. तथागत गौतमबुद्धांनी आपलं तत्त्वज्ञान जनतेच्या भाषेत म्हणजे त्याकाळच्या पाली भाषेत मांडलं , तर वैदिकांनी ठरविक वर्गाची जहागिरी असलेल्या संस्कृत भाषेत आपलं तत्त्वज्ञान मांडलं. म्हणून बुद्धाचं तत्त्वज्ञान जगभर प्रसिद्धी पावलं. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं , त्याचं भारतीय व्यवस्थेत कोणीही पूर्णपणे विश्लेषण केलेलं नाही , आणि मी म्हणतो , हे जाणीवपूर्वक केलेलं नाही. हा माझा इथल्या व्यवस्थेवर आरोप आहे. सामाजिक विषयावर अनेक पी.एचडी. घेण्यात आल्या , पण त्यांच्याही विश्लेषणात बाबासाहेबांचा बौद्ध धम्म स्वीकारणं व त्याच्या परिणामाची चर्चा केली गेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारण्यापूवीर् या देशात लोकांनी मुसलमानांची राजवट , छोट्या छोट्या विभागातील राजांची राजवट , अशोकाची राजवट , ब्रिटिशांची राजवट यांचा अनुभव घेतला होता. भारताचा एकतेचा आणि शांततेचा काळ हा अशोकाच्या कालावधीतच दिसतो. उरलेल्या कालावधीत एकमेकांशी लढणं , एकमेकांना संपवणं , मोगलांचा ,ब्रिटिशांचा संघर्ष , त्यात एकमेकांवर कुरघोडी करणं याच गोष्टी दिसतात. त्याकाळी राजांच्या भांडणांची कारणं कोणत्या देवाला कोण मानतो वगैरे असायची. जातीच्या अहंकारातून कत्तली केल्या जायच्या. त्याकाळी वैदिक परंपरा विरूध्द संतपरंपरा , असा तो लढा होता. पण या दोन्ही विचारसरणींना हिंदू या शब्दाने संबोधल्यामुळे ना सामाजिक विचारसरणी बदलली, ना त्यामुळे असलेली एकमेकांबद्दलची द्वेषभावना. अशा व्यवस्थेत बाबासाहेबांनी , स्त्री-पुरुष भेद मिटवणारा , एकमेकांचा आदर करायला शिकवणारा , समाजात सामंजस्य निर्माण करणारा , बुद्धिप्रामाण्यावादी , विज्ञाननिष्ठ असा बौद्ध धम्म स्वीकारला आणि देशाला मानवतेचा चेहरा प्राप्त करून दिला.

भारतीय समाजव्यवस्थेत जो वर्ग गुलामीत आणि अस्पृश्यतेत जीवन जगत होता , त्याला बौद्ध धम्मामुळे एक नवसंजीवनी मिळाली. याचंच प्रत्यंतर आपल्याला कालांतराने बघायला मिळालं. ज्यांनी बौद्ध धम्म आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्या वर्गाची शैक्षणिक , सामाजिक , आथिर्क प्रगती झाली. ज्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला नाही , त्यांची प्रगती मंदावली. याचं मुख्य कारण म्हणजे मनूच्या सामाजिक जातिव्यवस्थेने नुसतं आथिर्क गुलाम केलं नव्हतं , तर मानसिक गुलामही केलं होतं. बौद्ध धम्म स्वीकारल्यामुळे त्यांनी स्वत:ला मानसिक गुलामीतून मुक्त केलं. मी माणूस आहे आणि माणसाचे काही निसर्गदत्त अधिकार आहेत , ते उपभोगणं हा माझा अधिकार आहे. मी इतरांपेक्षा कमी नाही. म्हणून मला बरोबरीने वागवलं गेलं पाहिजे. अशारितीने तो स्वत:ला घडवत गेला आणि प्रगतीशील झाला. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याअगोदर नवीन व्यवस्थेत समाज एकसंध राहावा म्हणून बौद्ध महासभेच्या खांद्यावर नवी संस्कृती , नवी परंपरा , नवी रूढी निर्माण करण्याची जबाबदारी दिली होती. ज्याचा आधार समता आणि बंधुत्व असेल. हे काम बाबासाहेबांच्या नंतरही ही संस्था करीत आहे. याही संस्थेला बदनाम करण्याचं , पर्यायी संस्था उभी करण्याचं काम अनेकांनी केलं. परंतु बौद्ध अनुयायांनी ते हाणून पाडून बौद्ध महासभा ही त्यांची मातृसंस्था मानली आणि तिने दिलेले कार्यक्रम प्रथा , व्यवस्था मान्य केल्या. बौद्ध महासभेच्या आज अठरा राज्यात संघटना असून तिने धर्मांतर सुवर्ण महोत्सवी वर्षात अनेक संकल्प केले , त्यापैकी अनेक तडीस नेले. सोलापूर , परभणी , अहमदनगर , नांदेड येथे दीक्षेचे कार्यक्रम करून विविध मागास जातीतील हजारोंना बुद्ध धम्माची ओळख पटवून दिली. महाराष्ट्रात आज ५००० बौद्धाचार्य , एक हजार शिक्षक आणि दहा हजार समता सैनिक दलाचे सैनिक समतेचा संदेश देत आहेत. देशभरातील बौद्ध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी , बौद्ध महासभेने अल्प दरात सहलींचं आयोजन केलं , आतापर्यंत सुमारे वीस हजार लोकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. या संकल्पवर्षात स्वत:च्या जागा घेऊन महाविहार निर्माण करण्याचं कार्य महाराष्ट्रात सहा ठिकाणी मूर्त रूपात पहायला मिळतंय , तर माता रमाई स्मारक मु. पो. वणंद ,तालुका दापोली , जि. रत्नागिरी येथे आकारास येत आहे. बौद्ध महासभा विविध चोवीस कार्यक्रमातून धम्माची शिकवण देत आहे. आज असंख्य कार्यकतेर् बौद्ध महासभेत योगदान देतात. त्यांच्या संस्थेकडून काहीही अपेक्षा नसतात. ते समपिर्त भावनेतून काम करतात. आपल्यावर उद्या काही आरोप होऊ नयेत म्हणून ज्यांनी ज्यांनी धर्मांतर केलं त्या सर्वांचे ' मी स्वेच्छेने धर्मांतर केले ', असे संस्थेने फॉर्म भरून घेतले आहेत. धम्मदीक्षेचे कार्यक्रम आजही सुरू आहेत. मध्यंतरी साहित्यिक लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्तांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्याचं आम्ही स्वागत करतो. त्यांनी स्वीकारलेल्या बौद्ध धम्मावर काहींनी टीका केली , हेतूबद्दल शंकाही उपस्थित केल्या. पण आम्ही त्यांच्या हेतूबद्दल शंका न घेता त्यांच्या कृतीचं समर्थन करतो. त्यांच्यासोबत जे दीक्षित झाले आहेत , त्या भटक्या विमुक्त समाजातील लोकांची सर्वांगीण शैक्षणिक , सामाजिक आणि आथिर्क प्रगती व्हावी म्हणून बौद्ध बांधवांनी प्रयत्नशील राहायला हवं. या व्यवस्थेने भटक्या विमुक्त समाजाला न्याय तर दिला नाहीच उलट त्यांना राहाण्याचं ठिकाणही नाकारलं. त्यांना कोणत्याही सामाजिक आणि आथिर्क प्रगतीचा लाभ झालेला नाही. ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली त्यांनी आपली सामाजिक , आथिर्क , शैक्षणिक आणि राजकीय ' आयडेन्टिटी ' निर्माण केली. त्याच आयडेन्टिटीशी आपली नाळ जुळली तर आपली सुद्धा प्रगती झाल्याशिवाय रहाणार नाही , असं लक्ष्मण मानेना वाटते. त्यांचं हे वाटणं शुद्ध स्वरूपाचं आहे , असं मी मानतो. 

१९५६ ला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि इकडे काँग्रेसने जातीच्या आधारावर मिळणाऱ्या बौद्धांच्या सवलती बंद केल्या. धम्मदीक्षेच्या विरोधात वातावरण निर्माण केलं गेलं असताही दीक्षेचे समारोह चालूच राहिले. नवीन पिढी उदयास आली , तिला ' बौद्ध ' म्हणून राखीव जागेचा फायदा घेता येत नसे. त्यावेळी आम्ही अनेकांना नोकरी लागावी म्हणून बौद्धाचं ' हिंदूमहार ' कसं करावं हे तंत्र शिकवत होतो. हे करीत असताना मनाला सतत टोचणी होती की , आपण चळवळीशी प्रतारणा करीत आहोत. हे बदललं पाहिजे असं सतत वाटायचं. काँग्रेसने काय केलं ? तर तुम्ही धर्मांतरीत झालात , हे थांबवणं आमच्या हातात नसलं तरी तुम्हाला पुन्हा ' महार ' बनवणं हे मात्र आमच्या हातात आहे , असं दाखवून दिलं आणि चळवळीचा मोठा अपमान केला. या अपमानातून बाहेर काढण्याचं काम विश्वनाथ प्रताप सिंगांनी केलं. 

माझी त्यावेळी कवाडे आणि गवई यांच्याशी चर्चा झाली होती. मी त्यांना एकच म्हणालो , की या पापात मी सहभागी नाही. तुम्ही दोघं त्या पापाचे भागीदार आहात. समाजाला थुंकायला लावलं आणि चाटायला लावलं काँग्रेसनं. तुम्ही त्यांच्याबरोबर आहात. उद्या व्ही. पी. सिंगांची सत्ता येईल , न येईल , पाच वर्षांमध्ये आमदार , खासदार होऊ किंवा न होऊ याची फिकीर नाही , पण या माणसानं बौद्धांच्या सवलती देण्यासाठी घटनादुरुस्ती करून आपल्याला पुन्हा स्वाभिमान दिला. बाबासाहेबांनी आपल्याला जो सन्मान दिला होता , तोच या माणसानं आपल्याला पुन्हा प्राप्त करून दिला. म्हणून काहीही झालं तरी माझ्याबरोबर एकही माणूस जरी आला नाही तरी एक निवडणूक मी त्यांच्याबरोबर जाईन. मी त्यावेळी ठाम भूमिका घेतली. त्या पूवीर्च्या गेल्या चाळीस वर्षात प्रत्येक हॅण्डबीलवरची पहिली मागणी कोणती होती ? तर बौद्धांच्या सवलतीची! ती सोडवणाऱ्याच्या पाठीमागे जाणार नसाल आणि ज्यांनी थुंकी चाटायला लावली त्यांच्यामागं जाणार असाल तर माझ्या मते तो सर्वात मोठा ' वैचारिक भ्रष्टाचार ' आहे. निदान मी तरी तो करणार नाही , हे माझ्यापुरतं मी ठरवलं. प्रश्ान् चळवळीच्या विश्वासार्हतेचा आहे. सत्ता म्हणजे सर्वस्व आणि आपण सत्तेसाठीच राजकारण केलं पाहिजे ही जी काही चुकीची संकल्पना समाजामध्ये रूढ झालेली आहे , ती आपण बदलणं आवश्यक आहे. गवई १५ वर्षं सत्तेत होते , नव्हे स्पीकर होते. तरीही त्यांना कधी बौद्धांच्या सवलतीचा प्रश्ान् सोडवता आला नाही. दादासाहेबांनी भूमिहीनांचा सत्याग्रह केला नसता आणि डाव्यांनी मदत केली नसती तर कदाचित महाराष्ट्र शासनानंही हा प्रश्ान् सोडवला नसता. तेलंगणाची चळवळ बिहारपर्यंत येऊन थडकली होती. तेलंगणा ते औरंगाबाद , औरंगाबाद ते नगर , नगर ते नाशिक , नाशिक ते दिंडोरी आणि दिंडोरी ते सुरत असा या चळवळीचा प्रवास सुरू होता. याला ब्रेक लावायचा असेल तर त्यातून बौद्धांना बाहेर काढा , हे सूत्र यशवंतराव चव्हाणांना समजलं होतं. त्यामुळे १९६० मध्ये त्यांनी भूमिका घेतली की , घटनाबाह्य असेल तर असेल पण मी महाराष्ट्रापुरत्या बौद्धांना सवलती देतो. डाव्यांबरोबर ज्यावेळी दादासाहेब गेले त्यावेळी त्यांनी अँन्टी काँग्रेस राहूनच महाराष्ट्रापुरता बौद्धांच्या सवलतींचा प्रश्ान् सोडवला. केंदामध्येसुद्धा बौद्धांचा प्रश्ान् अँन्टीकाँग्रेस राहूनच सोडवता आला. 

आजची रिपब्लिकन चळवळ एकजातीय दिसते. पण बाबासाहेबांनी आपल्या चळवळीला कधीही एकजातीय बनू दिलं नव्हतं. १९३७ साली स्वतंत्र मजूर पक्षाने विधानसभेसाठी स्पृशास्पृश्य उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यापैकी अनंतराव चित्रे , भाऊसाहेब गडकरी , शामराव परुळेकर या स्पृश्य उमेदवारांनी विजय मिळविला होता. पण आज मायावती कांशीराम यांनी आम्हीच हा पहिला प्रयोग केला आणि करतोय , असे दावे ठोकले. महाराष्ट्रात आम्ही भारिप-बहुजन महासंघाच्या माध्यमातून बहुजन राजकारणाला गती देऊन यशस्वी केलंय. आदिवासी , बंजारा , धनगर , कोळी समाजाचं नेतृत्व आम्ही विधानसभेत पाठवलं. स्थानिक स्वराज्य संस्थेत तर आम्ही ' मायक्रोस्कोपिक ' कम्युनिटीलाही सत्तेत नेऊन बसवलं आहे. मूळात आज ज्या चळवळी आहेत त्या स्वत:च्या व्यक्तिगत स्वार्थासाठी उभ्या राहिल्या आहेत. रामदास आठवले यांनी आथिर्क निकषांवर आधारित आरक्षण देण्यासाठीच्या जाहीरनाम्यावर सही का केली ? पंढरपूरमधून स्वत:ला खासदार व्हायचंय म्हणून ? म्हणजे एका पंढरपूरच्या सीटसाठी चळवळीशी प्रतारणाच नाही , तर आंबेडकरी चळवळीशी फारकत घ्यायची वेळ आली तरी चालेल. संपूर्ण आंबेडकरी समाजाला मी मूर्ख बनवू शकतो , या भावनेतूनच हा विश्वास आला आहे. आता गवईंच घ्याना. काँग्रेसने त्यांना एवढं वापरलं आणि आता जाता जाता गव्हर्नर केलं. ते गव्हर्नर झाले त्यात आनंद आहे मला ; पण त्यांच्या गव्हर्नरशीपचा समाजाला काय फायदा आहे ? चळवळीचे कोणते प्रश्ान् सुटले ? समाजाचे काय प्रश्ान् सुटले ? 

१९६५ च्या निवडणुकीत बिगर काँग्रेसी सरकार आलं. उत्तर प्रदेश आणि पंजाब या दोन राज्यात आर. पी. आय.चा सहभाग होता. महाराष्ट्रातील चळवळ काँग्रेसच्या दावणीला बांधल्यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झाली तीच परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये बी. पी. मौर्य काँग्रेसमध्ये गेल्यानंतर झाली होती. नेतृत्त्वहीन झालेल्या समाजाला कांशीरामांच्या निमित्ताने नेता मिळाला. त्या नेतृत्वाच्या पाठीमागं तो राहिला आणि पुन्हा सत्तेत गेला. त्यामुळे ते जे त्यांचं यश सांगतात ते त्यांचं नाही. मुळात ती भूमी बाबासाहेबांनी आणि त्यावेळच्या कार्यर्कत्यांनी सुपीक केली होती. त्यामध्ये बी. पी. मौर्यांचासुद्धा सहभाग होता. म्हणून त्यांना चरणसिंग सरकारच्या वेळी खासदार होता आलं , सत्ता मिळवता आली. तोच नेता काँग्रेस पक्षात गेल्यानंतर नेतृत्वहीन झालेल्या चळवळीला नेतृत्व मिळालं , ते बाबासाहेबांचं होतं. मग ते आर. पी. आय.चं होतं की बी. एस. पी.चं होतं याची समाजानेने पर्वा केली नाही. तो समाज सत्तेत गेला. 

कांशीराम आणि मायावती हे केव्हाही आंबेडकरवादी नव्हते. कांशीराम यानी जो विचार मांडला तो करुणेचा नव्हता तर द्वेषाचा होता. ते नेहमीच म्हणत , जे खाली आहेत , त्यांना वरती आणायचं आहे आणि जे वरती आहेत त्यांना खाली आणायचं आहे. त्यातून त्याना कायम एक संघर्ष अपेक्षित होता. त्या दोघांनीही स्वत:ची चळवळ उभी करण्यासाठी बाबासाहेबांचा वापर केला. आणि बाबासाहेबांच्या नावाने त्यांनी आपली स्वत:ची ' थिअरी ' मांडली. पुणे कराराचा धि:कार हा त्यातला त्यांचा आवडता कार्यक्रम. ब्रिटिशांच्या राजवटीत स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन होणार आणि त्यामार्फत विकासाच्या कामांना सुरूवात होणार आणि नेमक्या अशा वेळी मागासवगीर्य प्रतिनिधी निवडून आले पाहिजेत , या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. या मागणीला म. गांधींनी विरोध केला. नंतर समझोता होऊन पूनापॅक्ट निर्माण झाला. या पुनापॅक्टचा धिक्कार करणारा कार्यक्रम बीएसपीकडून आखला जातो. भारताला ज्यावेळी स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी , मी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी सोडतो , असं जाहीर केलं. त्याची त्यांनी कारणंही दिली. बाबासाहेब म्हणाले , ' आम्हीच उद्याचे राज्यकतेर् आहोत. तेव्हा त्या राज्यामध्ये आपलं वेगळेपण ठेवण्यापेक्षा , अलिप्ततावादी राहाण्यापेक्षा त्या व्यवस्थेत सामील होऊन त्याचं नेतृत्व करण्याची संधी आपण घालवून देता कामा नये. ' आज कांशीराम आणि मायावतीचे अनुयायी याच पुनापॅक्टचा विरोध करीत आहेत. ज्या पुनापॅक्टमुळे शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण लागू झालं. त्याचा धि:कार करायचा असेल तर त्यांनी या कराराच्या माध्यमातून मिळालेल्या शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं जे आरक्षण मिळतंय त्याचा त्याग करावा , असं आवाहन आपल्या अनुयायांना का केलं नाही ? पुनापॅक्टचा फक्त राजकीय संदर्भ घेऊन त्याचा निषेध करणं याचाच अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे पुनापॅक्टचे ' व्हिलन ' आहेत , असं चित्र ते उभं करू पाहात आहेत. अशी अनेक उदाहरणं आणि त्यांचा कार्यक्रम यामार्फत ते बाबासाहेबांना ' रिप्लेस ' करून कांशीराम यांना मोठं करू पाहात आहेत. उत्तरप्रदेश सरकारच्यावतीने मुख्यमंत्री मायावतींनी जो कार्यक्रम घोषित केला , त्यामध्ये बारापैकी अकरा योजना कांशीरामांच्या नावाने व फक्त एक योजना माता रमाईच्या नावाने दिसते. उत्तरप्रदेशातील आंबेडकरपार्कचा प्रचार मायावती यांनी इतर राज्यात तसंच उत्तर प्रदेशातील निवडणुकीत वापरला आणि मतांची गणित मांडली. त्याच मायावतींनी आंबेडकरपार्कचं रूपांतर कांशीराम पार्कमध्ये धडाक्याने सुरू केलंय. त्यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ' रिप्लेस ' करण्याचं काम जोरात सुरू आहे. 

भारतीय राजकारणात आता एक व्यक्ती आणि त्याची 'लिडरशिप' मान्य होणार, अशी काही परिस्थिती नाही. लोक, आता मी या जातीचा आहे , असं म्हणत नाहीत तर मी अमुक समाजाचा आहे, असं म्हणतात. देशाच्या एकतेसाठी ही 'फेज' मी चांगली मानतो. परंतु देशाचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींसाठी ही अत्यंत वाईट बाब आहे. जातीतून समाजाकडे होणारं परिवर्तन हे संघर्षमय परिवर्तन आहे. या संघर्षमय परिस्थितीत ज्याला कुणाला अंतविर्रोध सांभाळता किंवा कमी करता येतील अशांचं नेतृत्व टिकून राहील. यामध्ये उपेक्षित समूह , दलित समूह यांना आपण सत्तेवरती आलो पाहिजे , ही इच्छा आहे. आणि त्यासाठी पहिल्यांदा ते काहीही करण्यास तयार आहेत , जे आज आपल्याला उत्तरप्रदेशमध्ये दिसतंय. जेव्हा या उत्तरप्रदेशातील उपेक्षित आणि दलित समूहाला कळून चुकेल की आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही , तेव्हा ते बाहेर पडलेले असतील आणि ते नव्या पर्यायाच्या शोधात असतील. हा जो संघर्षमय काळ आहे तो बोटीतल्या तुटलेल्या होकायंत्रासारखा आहे. ही बोट भरकटत आहे. पंतप्रधानपदाचं स्वप्न बघणारे आणि दाखवणारे 

यांच्याकडे नवीन होकायंत्र नाही. हे जे ' पोलिटिक्स ऑफ ग्रिमिक्स ' आहे , ते फार काळ चालणार नाही. तेव्हा मायावतींनी पंतप्रधान झाल्यावर मी बौद्ध धम्माची दीक्षा घेईन , असं म्हणणं म्हणजे , दीक्षांतरित लोकांना आकषिर्त करण्यासाठी दाखवलेलं गाजरच होय....!

लेखक - अॅड. प्रकाश आंबेडकर.........!  

संपादन अँड. राज जाधव...!!! 

1 comment:

  1. पण बाबासाहेबांनी स्वतःpoona pact चा विरोध केला 1947 1952 मध्येही ...

    ReplyDelete